पुणे / प्रतिनिधी :
छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरीवर कायमस्वरूपी भगवा ध्वज पुढील वर्षीच्या शिवजयंतीपूर्वी लावला गेला नाही, तर राज्यव्यापी आंदोलन करू, असा इशारा खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी दिला. या मागणीसाठी शासकीय कार्यक्रमावर टाकलेला बहिष्कार हा भगवा जाणीव आंदोलनाचा एक टेलर होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. कोल्हे म्हणाले, हे आंदोलन राजकीय अथवा पक्षीय नाही. तर ही महाराष्ट्रातील शिव-शंभू भक्तांची भावना आहे. एक वर्षाच्या कालावधीत शिवनेरी गडावर कायमस्वरूपी भगवा ध्वज लावला नाही, तर राज्यव्यापी आंदोलन करू. शिवनेरी किल्ल्यावर कायमस्वरूपी भगवा ध्वज लावावा, अशी मागणी गेल्या दोन वर्षांपासून करत आहोत. यासंदर्भात केंद्रीय सांस्कृतिक मंत्री तसेच भारतीय पुरातत्व विभागाच्या महासंचालकांची भेट घेतली असून, पत्रव्यवहारही केला आहे. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या राज्यातील खासदारांच्या बैठकीतही याबाबतची मागणी केली होती. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याची कैफियत डॉ. कोल्हे यांनी मांडली.
अधिक वाचा : ठाकरे, शिंदेंसाठी सध्याचा काळ कसोशीचा