राज्य सरकारकडून घोषणा
वृत्तसंस्था/ चेन्नई
मदुराई जिल्ह्य़ातील अरिट्टापट्टी आणि मीनाक्षीपुरम या गावांना जैववैविध्य वारसा प्रतिकाचा दर्जा देण्याची घोषणा तामिळनाडू सरकारने केली आहे. ही दोन्ही ठिकाणे राज्यात विशेष असून येथे अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. तसेच अनेक विलुप्तप्राय प्रजातींचे अस्तित्व आहे. तामिळनाडू सरकारने याकरता एक अध्यादेशही जारी केला आहे. राज्य सरकारकडून मदुराई जिल्हय़ातील अरीतापट्टी, मीनाक्षीपुरम समवेत 193.215 हेक्टर क्षेत्राला जैववैधिय वारसा क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. जैववैविध्य महत्त्व असलेल्या या भागात हजारो वर्षे जुना ऐतिहासिक वारसा आणि पक्षी तसेच प्राण्यांच्या दुर्लभ प्रजाती आहेत. तसेच प्राचीन टेकडय़ा, कुदैवरा शिव मंदिर, दोन हजार वर्षे जुने जैन स्थळ या भागात असून याचे संरक्षण पुरातत्व विभागाकडून करण्यात येत आहे.