वृत्तसंस्था/ कोलकाता
आयपीएलचा यंदाचा मोसम हा कोलकाता नाइट रायडर्ससाठी चांगला गेलेला नसून त्यांच्याबाबतीत रिंकू सिंग हा एकमेव चर्चेचा मुद्दा राहिलेला आहे. परंतु या तऊण खेळाडूने आपले पाय जमिनीवरच ठेवताना ‘टीम इंडिया’ची दारे आपल्यासाठी उघडी होतील की नाही याविषयी विचार न करणेच पसंत केले आहे.
या मोसमाच्या सुऊवातीला गुजरात टायटन्सविऊद्धच्या विजयात सलग पाच षटकार खेचल्याने गाजलेला रिंकू या मोसमात ‘केकेआर’चा अव्वल फलंदाज आणि फिनिशर म्हणून उदयास आला आहे. भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्राr यांनीही भारताच्या विश्वचषकासाठीच्या संघात त्याची निवड व्हायला हवी असे मत व्यक्त केलेले आहे.
शनिवरी लखनौ सुपर जायंट्सकडून एका धावेने ‘केकेआर’ पराभूत झाल्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधताना रिंकू म्हणाला की, असा मोसम राहिल्यानंतर कोणालाही खूप छान वाटेल. पण मी भारतीय संघात निवडलो जाणार की नाही इतक्या दूरचा मी विचार करत नाही, असे त्याने स्पष्ट केले. सदर खेळाडूने त्या लढतीत 33 चेंडूंत नाबाद 67 धावा काढल्या. हे त्याचे या मोसमातील चौथे अर्धशतक होते आणि लखनौविऊद्ध आणखी एक रोमांचक विजय त्याने जवळजवळ खेचून आणला होता.
रिंकूने ‘केकेआर’तर्फे सर्वाधिक धावा काढलेल्या असून 59.25 च्या सरासरीने आणि 149 हून अधिक स्ट्राइक रेटने 474 धावा जमविलेल्या आहेत. ‘घरातील प्रत्येक जण खरोखरच आनंदी आहे. गेल्या वर्षी माझ्या खेळींमुळे लोकांना माझ्याबद्दल माहिती मिळाली होती. पण ते पाच षटकार खेचल्यानंतर मला खूप आदर मिळू लागला आहे. आता बरेच लोक मला ओळखतात. मी आनंदी आहे, पण अत्यानंदी नाही, कारण आम्ही शेवटी स्तर पार करू शकलो नाही’, असे त्याने सांगितले.
लखनौविऊद्ध जिंकण्यासाठी शेवटच्या तीन चेंडूंत तीन षटकारांची गरज होती, म्हणजे स्थिती गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यासारखीच होती. ‘मी पूर्णपणे निवांत होतो आणि जे काही होईल ते पाहू असा विचार केला. सलग पाच षटकारांची बाब माझ्या मनात आली होती. मी षटकार खेचण्याच्या बाबतीत फक्त एक चेंडू चुकवला आणि तो चौकार ठरला’, अशा शब्दांत त्याने खेद व्यक्त केला.