शेतकऱयांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन : तीव्र आंदोलनाचा इशारा, खासगी विपेत्यांकडून बियाणांचे दर दुप्पट
प्रतिनिधी /बेळगाव
खरीप पिकाच्या पेरणीला जोरदार प्रारंभ झाला आहे. मात्र, याच काळात बी-बियाणे आणि खतांचा काळाबाजार केला जात आहे. बियाणे तसेच खतांचे दर तीन ते चारपटीने वाढवून खासगी विपेते शेतकऱयांची लुबाडणूक करीत आहेत. तेव्हा तातडीने काळाबाजार रोखा, यासह इतर मागण्यांसाठी शेतकऱयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली.
वळिवानंतर आता मान्सूनला लवकरच सुरुवात होणार आहे. त्यामुळे बळीराजा पेरणीच्या तयारीला लागला आहे. असे असताना खासगी विपेत्यांनी बियाणांचे दर दुपटीने वाढविले आहेत. 800 रुपयांचे बियाणे 3 हजार रुपयांना तर बाराशे रुपये दर असलेले खत अडीच हजार रुपयेप्रमाणे विक्री केले जात आहे. मात्र, यावर कोणतेच नियंत्रण नाही. त्यामुळे यामध्ये शेतकरी भरडला जात आहे.
मुख्यमंत्री विविध आश्वासने देत असतात. जिल्हा प्रशासनामार्फत विक्री केंदे सुरू केल्याची माहिती दिली जाते. मात्र, प्रत्यक्षात त्या ठिकाणी बियाणे किंवा इतर सामग्री उपलब्ध नसतात. खतांचा दरही याच काळात वाढविला जात आहे. कृषी विभाग मुबलक प्रमाणात खत उपलब्ध असल्याचे सांगत असताना बाजारपेठेत खतच उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या समस्यांबरोबरच शेतकऱयांना कोणत्याही प्रकारची सबसिडी वेळेत दिली जात नाही. गंगाकल्याण योजनाही केवळ काही घटकांसाठीच लागू करण्यात आली आहे. ती योजनाही सर्वसामान्य शेतकऱयाला लागू करावी. शेतकऱयांच्या मुलांना शिक्षणासाठी देण्यात आलेले कर्ज माफ करावे, ग्राम पंचायतच्या निधीमध्ये 20 टक्के निधी हा शेतकऱयांच्या समस्या सोडविण्यासाठी राखीव ठेवावा, महागाई पाहता उसाचा दर प्रतिटन 4 हजार जाहीर करून द्यावा, यासह इतर मागण्याही या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
शिरस्तेदार नदाफ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नेगील योगी रयत संघाचे राज्याध्यक्ष रवी पाटील, कार्याध्यक्ष बसवराज मोकाशी, जिल्हाध्यक्ष मल्लिकार्जुन जुट्टण्णावर, सुरेश वाली यांच्यासह शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.