बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे राजेंद्र चोरगे यांची जिल्हाधिकाऱयांकडे विनंती
प्रतिनिधी/सातारा
सातारा तालुक्यातील पश्चिम भागात निसर्गाची मनमोहक उधळण आहे. तसेच वन विभागात अनमोल अशी जैवविविधता आहे. त्यामुळेच राज्य, राष्ट्रीय स्तरावर तसेच भारताच्या पश्चिम घाट परिक्षेत्रात या भागाला विशेष महत्त्व आहे. यामुळेच याभागातील पर्यटन क्षेत्र वाढीला लागले आहे. परिसरातील वन विभागात पर्यटकांसाठी नाईट सफारीचे केलेले नियोजन तातडीने रद्द करावे व वन्य जीवनावर होणारे मानवी आक्रमण थांबवण्यात यावे, अशी विनंती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी केलेली आहे.
जिल्हाधिकाऱयांना दिलेल्या निवेदनातून म्हटले आहे की, कास पठार आंतरराष्ट्रीय संरक्षित स्थळ बनू राहत आहे. अशावेळी या परिसरात मानवी हस्तक्षेप प्रचंड प्रमाणात वाढला आहे. कास पठाराला घातलेले कुंपण हे अवैज्ञानिक असल्याचे अनेक दाखले व प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे त्या क्षेत्रातील आभ्यासक व मान्यवरांनी सादर केले आहेत. उपरोक्त परिसरातील जैवविविधता वाचवण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे, ती होताना दिसत नाही. उलटपक्षी या परिसरात नाईक सफारीचा अनैसर्गिक व अशास्त्राrय प्रयोग नियोजित असल्याचे समजते. असे होणे अत्यंत चुकीचे आहे. दुर्मिळ व अनमोल अशा जैविविधता टिकवण्यासाठी व वन्यप्राण्यांचे रक्षण होण्याच्या दृष्टीने हा निर्णय घातक आहे. जंगलातील प्राणी आपले जीवन, सहवास हा रात्री जगतात. त्यामुळे अशा नाईट सफारीने त्यांच्या अधिवासात प्रचंड बदल होणार आहे. पर्यटनाच्या नावाखाली सुरू असलेले अनैसर्गिक प्रयोग सुरूवातीला रंजक वाटतील मात्र, येथील नैसर्गिक विविधता संपुष्टात आणतील. वनसंपदेचे रक्षण करण्यासाठी स्थानिक रहिवाशांवर निर्बंध लादायचे आणि नाईट सफारीच्या माध्यमातून पर्यटकांचे चोचले पुरवायचे हे अशास्त्राrय आहे. याला आमचा तीव्र विरोध आहे.
कोणत्याही परिस्थित नाईट सफारीचा प्रयोग आम्ही होवू देणार नाही. आपण हे तातडीने रद्द करावे. अन्यथा आम्हाला आमच्या जिल्हय़ाच्या जैविविधता रक्षणासाठी लोकशाही मार्गाने लढा तीव्र करावा लागेल. याबाबतचा सविस्तर अहवाल आम्ही आपणास शक्य तितक्या लवकर सादर करणारच आहोत. मात्र, आत्ता तातडीने त्या विरोधात मनाई हुकूम निघावा, अशी विनंती करण्यात आली आहे.