नवी दिल्ली : विषारी हवेमुळे दिल्लीवासीयांच्या समस्या वाढल्या आहेत. याप्रकरणी उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांना नाराजी व्यक्त केली आहे. दिल्लीच्या प्रदूषणासाठी अन्य राज्यांना जबाबदार ठरविणे हा काही उपाय नाही. याचा खरा तोडगा दिल्लीतच आहे. दिल्लीला कारवाईची गरज आहे. केवळ ढोंग करणे यावर उपाय नसल्याचे म्हणत उपराज्यपालांनी अरविंद केजरीवाल सरकारवर शरसंधान केले आहे. पंजाबकडून फसवणूक झाल्यावर आम्ही केवळ दयेसाठी अर्ज करू शकतो. दिल्लीत एक्यूआय अद्याप 400 च्या आसपास असल्याने राजधानी धापा टाकत आहे अशा शब्दांत उपराज्यपाल सक्सेना यांनी आप सरकारला लक्ष्य केले आहे.
Previous Articleटाटा मोटर्सचा समभाग उच्चांकावर
Next Article बजाज फायनान्सचा समभाग घसरणीत
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.