जवळ जवळ १५ ते २० भटक्या कुत्र्यांनी झोपेत असताना एका भीक मागणाऱ्या महिलेचे अक्षरशः लचके तोडले. यात त्या महिलेचा मृत्यू झाला असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. धारवाड तालुक्यातील उप्पीन बेटगेरी येथे ही घटना घडली. स्थानिकांनी याची माहिती गरग पोलीस स्थानकात दिल्यानंतर पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
Previous Articleसातारा पोलीस दलाची मैदानी चाचणीचे गुणपत्रक जाहीर
Next Article स्कूल बसखाली सापडून ५ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू