कास महोत्सवाला 30 लाख रुपयांचा खर्च पर्यटन आणि डीपीसीतून; पीएम किसान सन्मान योजनेच्या केवायसी जोडण्याचे 93 टक्के काम पूर्ण; महाबळेश्वरसाठी आलेला 50 कोटींचा निधी खर्च
सातारा प्रतिनिधी
कास हे जसे फुलांचे पठार आहे. तसे ते थंड हवेचे ठिकाण आहे. त्या ठिकाणी फक्त फुलांच्या मोसमामध्ये पर्यटक येतात असे गृहीत धरुन आता बारामाही पर्यटक कसे येतील यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. वेगवेगळे नाविण्यपूर्ण योजना तेथील स्थानिकांना सोबत घेवून करणार आहे. जसे की प्री व्हेडिंग फोटो शुट पॉईंड, जाळय़ाबाबतही माझा पाठपुरावा सुरु आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, त्यांनी कास महोत्सवासाठी 30 लाख रुपये पर्यटन विकास आणि जिल्हा नियोजनमधून खर्च करण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, साताऱयात सर्वच अधिकारी चांगले आहेत, कामाचा व्याप मोठा आहे. माझ्याकडे कमीत कमी दिवसाला 50 ते 60 जणांना दररोज भेटायला येतात. त्यांच्या शंकेचे समाधान करत इतरही कामे करतो. जिह्यातील पीएम किसान सन्मान योजनेचे 93 टक्के काम पूर्ण झाले आहे. ई केवायसीचे हे काम काही दिवसांत पूर्ण होईल. ज्यांना पीएम किसान सन्मान योजनेतून वगळे आहे. त्यांनी पुन्हा रजिस्ट्रेशन करुन योजनेत सहभागी होवू शकतात. त्याकरता तहसीलदार कार्यालयात पाठपुरावा करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. शेतकऱयांच्या ई पिक पाहणीसाठी शेतकऱयांनीच पीक पहाणी करणे गरजेचे आहे, असे सांगितले. महाबळेश्वरच्या प्रकल्पाबाबत प्रश्न छेडला असता ते म्हणाले, त्याकरता 50 कोटी निधी मंजूर झाला. तो खर्च करण्यात येत आहे. फक्त साबणे रोड येथील काम राहिले आहे. मागे बैठक झाली होती. तेव्हा पालकमंत्र्यांनीच सुचना केल्या होत्या. असे सांsिगतले. कासवरील इलेक्ट्रीक बसबाबत बोलताना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले, तो पायलट प्रोजेक्ट होता. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. एका बसच्या 20 फेऱया होत आहेत. 1200 लोकांना कास फिरवून आणले जात आहे. कास परिसरात केवळ फुलांच्या हंगामापूरते पर्यटन न राहता कसे बारमाही पर्यटन करता येईल याचा माझा विचार आहे. अनेक उपक्रम कसे राबवता येतील त्याकरता माझा प्रयत्न आहे. स्थानिकांना सोबत घेवून मी तो शासनाच्या माध्यमातून पूर्णत्वास नेणार आहे, असे त्यांनी सांगितले. त्याकरता वनविभागाशी चर्चा सुरु आहे. जसे की प्री वेडींग फोटो शुट ही चोरी छुपे चालते तेथे काही पॉईंट विकासीत केल्यानंतर तेथे सुरक्षित असे प्री वेडिंग फोटो शुट करता येणार आहे. त्या ठिकाणी बोर्ड लावण्यात येणार आहेत. नुकताच झालेल्या कास महोत्सवासाठी पर्यटन आणि डीपीसीमधून 30 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. फक्त फुलंच पहायला पर्यटक येतात. त्यांना आणखी काही ऍक्टीव्हीटी पहायला मिळाव्यात म्हणून मनोरंजनात्मक कार्यक्रम ठेवले होते. तेथे हॉटेल सोडून ही फायदा होऊ शकतो. महिला बचतगटांना उमेद अभियानाच्या माध्यमातून कसे सक्षम करता येईल याच ही कार्यवाही सुरु आहे. ग्रामपर्यटनही संकल्पना राबवण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
दोषींवर कारवाई करणार
पांचगणी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱयांच्या बाबतीत जो प्रकार घडला आहे. तो चुकीचा आहे. मी माहिती घेतली आहे. पोलिसांना तशा सुचना दिल्या आहेत. कोणी पण असू द्या. मी त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, असेही जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी स्पष्ट केले.