45 रुपयांचा समभाग 2700 वर पोहचला
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय शेअर बाजारात अनेकविध कंपन्यांचे समभाग दाखल होतात. पण काही मात्र एकदम चमकून जातात. त्यातलीच एक कंपनी म्हणजे एसआरएफ ही रसायन कंपनी होय.
सदरच्या मल्टीबॅगर समभागाचा भाव 45 रुपयांवरून एकदम 2700 रुपयांवर पोहचला होता. अनेक गुंतवणूकदारांना या समभागाने मालामाल केले आहे. ज्यांनी 1 लाख रुपये यात गुंतवले आहेत त्यांना 10 वर्षानंतर तब्बल 60 लाख रुपयांचा दमदार परतावा मिळाला आहे.
18 सप्टेंबर 2012 रोजी एसआरएफचा 45 रुपये असणारा समभागाचा भाव 19 सप्टेंबर 2022 रोजी 2682 रुपयांवर पोहचला आहे.