मुंबई
शेअरबाजारातील लिस्टेड कंपनीपैकी एक असणाऱया टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेडच्या समभागाने गुंतवणूकदारांना यंदा दमदार परतावा दिला आहे. जानेवारी 2022 मध्ये कंपनीच्या समभागाने सर्वोच्च भाव प्राप्त केला होता. या मल्टीबॅगर समभागाने केवळ तीन वर्षांमध्ये दमदार परतावा दिला आहे.
अडीच रुपये असणारा समभाग 100 रुपयांवर पोहोचला असून गुंतवणूकदारांना 3900 टक्के परतावा मिळाला आहे. टाटा ग्रुपच्या या समभागाने यावर्षी जानेवारीत 291 रुपयांपर्यंत मजल मारली होती. आतापर्यंतचा हा सर्वाधिक भाव मानला जात आहे. गेल्या 9 महिन्यात समभागात घसरण झालेली असली तरी ज्यांनी दीर्घकालीन गुंतवणूक केलेली आहे, त्यांना बंपर परतावा मिळाला आहे.
50 टक्के घटूनही उत्तम परतावा
यावर्षी जवळपास 50 टक्के इतका समभाग खाली आलेला आहे. मागील सहा महिन्यामध्ये समभाग 122 रुपयांहून 100 रुपयांपर्यंत घसरला आहे. समभाग जवळपास 20 टक्के इतका घसरणीत राहिला आहे.