काकतीत झेंडावंदनानंतर परतताना हल्ला
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात भटक्मया कुत्र्यांची समस्या मोठय़ा प्रमाणात भेडसावत असल्याने नसबंदीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. मात्र, या कुत्र्यांचा उपद्रव ग्रामीण भागातही वाढला असून झेंडावंदन करून घरी परतणाऱया 12 वर्षाच्या विद्यार्थिनीवर भटक्मया कुत्र्यांच्या टोळक्मयाने हल्ला केला आहे. या हल्ल्यात सदर विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी जिल्हा पंचायतचे अधिकारी लक्ष देतील का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
सदर घटना काकती गावातील असून 10 ते 12 भटक्मया कुत्र्यांच्या हल्ल्यात लक्ष्मी रामाप्पा नाईक ही मुलगी जखमी झाली आहे. घरी जात असताना या कुत्र्यांनी हल्ला चढवून लक्ष्मीला फरफटत नेत असताना या परिसरातून जाणारा युवक संजू धोणजी याचे लक्ष गेले. तातडीने धाडस करून संजूने कुत्र्यांपासून तिची सुटका केली. वेळेवर आल्याने मुलीचा जीव बचावला. मात्र, भटक्मया कुत्र्यांच्या हल्ल्यात मुलगी जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
काकती परिसरात भटक्मया कुत्र्यांची संख्या खूपच वाढली असून ग्रामस्थांनी ग्रा. पं. ला निवेदन देऊन कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. यापूर्वीही अशा घटना घडल्याने ग्रामपंचायतकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. पण ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळेच या मुलीला संकटाचा सामना करावा लागला आहे.
सध्या ग्रामीण भागात भटक्मया कुत्र्यांची संख्या वाढत असून नियंत्रणासाठी कोणतीच उपाय-योजना हाती घेतली नाही. शहरापासून जवळ असलेल्या गावांमध्ये भटक्मया कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. प्रमुख रस्त्यांवरून ये-जा करणाऱया वाहनधारकांच्या व लहान मुलांवर धावून हल्ला करण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे जिल्हा पंचायतीने याकडे लक्ष देऊन ग्रामीण भागातील भटक्मया कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.