गुरुवारीही तापमान 38.5 डि.से.ची नोंद
प्रतिनिधी / पणजी
वाढत्या तापमानाचा विद्यार्थीवर्गाला फटका बसू नये यासाठी शिक्षण खात्याने शाळा दुपारी 12 वाजेपर्यंतच चालू ठेवा असा आदेश दोन दिवसांसाठी काढला. त्यानुसार काल गुरुवारी शाळा दुपारी बारा वाजता सोडण्यात आल्या. गुऊवारी पारा पुन्हा एकदा 38.5 डि.से.पर्यंत होता. हवामान खात्याने पुढील दोन आठवड्यात सरासरीपेक्षाही तापमान खाली उतरणार आणि त्याचबरोबर 15 मार्चपर्यंत किंचित पावसाची शक्यताही व्यक्त केली आहे.
बुधवार व गुऊवार असे दोन्ही दिवस तापमान 38.5 डि.से. राहिले. तथापि, हे तापमान सरासरीपेक्षा 6 डि.से.ने जादाच होते. उकाड्यामुळे असह्य झालेल्या जनतेला पावसाची अपेक्षा आहे. हवामान खात्याने दि. 15 मार्च किंवा त्यानंतर हलकासा पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला. हवेतील आर्द्रता देखील वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. राज्यात आजही तापमान वाढीची शक्यता आहे. हवामान खात्याने दि. 13 मार्चपर्यंत वातावरण असेच तापलेले राहील असे म्हटले आहे. राज्यात सुरू झालेली उष्णतेची लाट दि. 15 मार्चनंतरच खाली उतरण्याची शक्यता आहे. तोपर्यंत तापमान असेच वाढत राहील.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी वाढत्या तापमानामुळे दुष्परिणाम होण्याची शक्यता व्यक्त कऊन जनतेला आवश्यक तेवढे पाणी प्या. तसेच तब्येतीची काळजी घ्या, अकारण दुपारी उन्हात फिऊ नका, असे आवाहन केले आहे.