रत्नागिरी प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त रत्नागिरीत सध्या ‘हर घर तिरंगा’ अभियान सुरु आहे. इथल्या शाळांनी देखील उत्स्फुर्त असा सहभाग नोंदवलाय. रत्नागिरीतील जीजीपीएस प्रशालेत अमृतमहोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांनी चक्क तिरंगा रंगाचे विविध पदार्थ आपल्या टिफीन बाँक्स मधून आणले होते.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे सर्वत्र जोरदार वातावरण पाहायला मिळत आहे, शासन, प्रशासन, स्थानिक स्तरावर त्यानिमित्त विविध उपक्रम, कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. येथील जीजीपीएस प्रशालेत तर इडली, घावणे ,पोळी, पुलाव, असे तिरंगामय विविध पदार्थ आणत या अमृतमहोत्सवानिमित्त अनोख्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त असा सहभाग नोंदवला. तर पालकांसाठीदेखील पाककला स्पर्धा घेण्यात आली. शाळेतील शिक्षक वर्गही या कार्यक्रमात सहभाग होता, त्यामुळे शाळेतील अवघे वातावरण तिरंगामय झाले होते. हर घर तिरंगा या अभियानाला उत्तम असा प्रतिसाद शाळांबरोबरच जिल्ह्यात इतर भागांमध्ये देखील पाहायला मिळतोय.