ऑनलाईन टीम/तरुण भारत
भाजप नेते सुब्रमण्यम स्वामींनी (BJP Leader Subramanian Swamy) सरकारवर हिंदू मंदिरांच्या सरकारीकरणाचा आरोप केला आहे. तसेच या विरोधात पंढरपूरला (Pandharpur) जाऊन स्थानिकांशी चर्चा करणार आहे. यानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिक दाखल करणार असल्याचे स्वामींनी जाहीर केले. मुंबईत इस्कॉन मंदिरात वारकरी पाईक संघ आणि इतर संघटनांनी सुब्रमण्यम स्वामींची भेट घेतली. त्यांनतर स्वामी मुंबईत बोलत होते.
सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, “पंढरपुरात हिंदू भक्तांना त्रास दिला जात आहे. सरकारने हिंदू मंदिरं हडपली आहेत. ही मंदिरं सरकारच्या ताब्यातून सोडवण्यासाठी मी स्वतः पंढरपुरात जाऊन लोकांना भेटणार आहे. सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन मी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. भगवान कृष्णांना सर्वजण मानतात. हिंदूंच्या पुनर्उत्थानासाठी हे करणं आवश्यक आहे.”
हे ही वाचा : मुख्यमंत्र्यांचे साताऱ्यात मंत्री देसाई यांच्याकडून स्वागत; जेसीबीमधून पुष्पवृष्टी
सुब्रहमण्यम स्वामींचे ट्विट –
भारतीय अर्थव्यवस्थेत मंदीची स्थिती निर्माण होण्याची शक्यताच नाही, असे अर्थमंत्र्यांनी सांगितल्याचे मला प्रसारमाध्यमांमधून कळाले. त्या बरोबर बोलत आहेत, कारण भारतीय अर्थव्यवस्था आधीच गेल्या वर्षी मंदीत गेली आहे. त्यामुळे मंदीच्या स्थितीत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा टोला सुब्रहमण्यम स्वामी यांनी ट्विटरच्या माध्यमातून लगावला होता.