मालवण /वार्ताहर–
मालवण तालुक्यातील ग्रामपंचायतींना वितरित करण्यात आलेले तिरंगा झेंडे निकृष्ट दर्जाचे असल्याने संबंधित ग्रामपंचायतच्या सरपंच यांनी गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर यांची भेट घेऊन तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान या प्रकरणी संबंधित झेंडा पुरवठाधारकाने खराब असलेले झेंडे परत घेऊन नवीन तिरंगा झेंडे देण्याचे आश्वासन दिल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला. यावेळी अशोक सावंत, धोंडी चिंदरकर, बाबा परब, विजय केनवडेकर, हडी सरपंच महेश मांजरेकर, सरपंच प्रतिमा भोजने, तोंडवली सरपंच आबा कांदळगावकर, सर्जेकोट सरपंच नीलिमा परळीकर, आचरा सरपंच प्रणया टेमकर, देवली सरपंच गायत्री चव्हाण आदी उपस्थित होते.