Tarun Bharat

सुधीर मुनगंटीवार अन् आता नाना पटोले चर्चेत; भाजपच्या ‘वंदे मातरम्’नंतर, काँग्रेसचं ‘जय बळीराजा

Maharashtra Politics : राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी फोनवर बोलताना हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणण्याचा निर्णय जाहीर केला यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जय बळीराजा म्हणावं, असे आदेश दिले आहेत. मुनगंटीवारांच्या ‘वंदे मातरम’च्या घोषणेनंतर आता काँग्रेसनं जय बळीराजाची घोषणा दिली आहे. त्यामुळे सुधीर मुनगंटीवारांनंतर आता नाना पटोले चर्चेत आले आहेत.

कार्यकर्त्यांनी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले, वंदे मातरम् आमचा स्वाभिमान आहे, पण बळीराजा जगाचा पोशिंदा आहे. वंदे मातरमला आमचा विरोध नाही. मात्र, जय बळीराजा म्हणणं यामागे आमची शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना आहे. बळीराजा हा देशाचा पोशिंदा आहे. त्याचा सन्मान करण्यासाठी आम्ही जय बळीराजा म्हणणार असल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.

Related Stories

पंजाबमध्ये कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 5414 वर

Tousif Mujawar

राज्यकर्ते म्हणजे रेड्याची अवलाद; सदाभाऊंचे वादग्रस्त विधान

datta jadhav

महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकेल ; शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास

Archana Banage

आरोग्य विभागाकडील १७ हजार रिक्त जागा भरणार – आरोग्य मंत्री टोपे

Archana Banage

हसन मुश्रीफांच्या वाढदिवसावरून रामायण ; मुरगूड पोलिसात तक्रार दाखल

Archana Banage

कोल्हापूर : पेठ वडगावात बँकेचे शाखाधिकारी कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage