18 मेपर्यंतची आकडेवारी : खाद्य मंत्रालयाकडून आकडेवारी सादर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताने चालू व्यापारी वर्षामध्ये 18 मेपर्यंत जवळपास 75 लाख टन साखर निर्यात केली आहे, अशी माहिती खाद्य मंत्रालयाने नुकतीच दिली आहे. साखरेचे व्यापारी वर्ष हे ऑक्टोबर ते सप्टेंबर या कालावधीपर्यंत सुरु राहते.
मंत्रालयाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार सध्या साखर सत्र 2021-22 मध्ये साखर निर्यात, साखर सत्र 2017-18 च्या तुलनेत 15 पट अधिक राहिले असल्याची माहिती आहे.
वर्ष 2020-21 मधील स्थिती
साखर निर्यातीच्या सुविधांसाठी मागील पाच वर्षांमध्ये साखर कारखान्यांना जवळपास 14,456 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. यासह बफर स्टॉक ठेवण्यासाठी 2,000 कोटी रुपयांचा खर्च आला आहे.
निर्यात होणारे देश
भारताकडून जगभरातील इंडोनेशिया, अफगाणिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, संयुक्त अरब अमीरात, मलेशिया आणि आफ्रिकन देशांना प्रामुख्याने साखर निर्यात केली जाते.