ऑनलाईन टीम/तरुण भारत
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी एकजूट दाखवून येणाऱ्या 17 आणि 18 नोव्हेंबरला ऊसतोड बंद ठेवून केंद्र सरकारला ताकद दाखवूया. साखरेचे दर क्विंटल मागे 3100 शे वरून 3500 शे रुपये करावी, इथेनॉलचे दर 5 रुपयांनी वाढवावेत, अशी मागणी या आंदोलनातून केली आहे. तर गायरान अतिक्रणाबाबत सामान्य गरिबांना वेळ द्यावा, त्यांना योग्य न्याय द्यावा, अन्यथा स्वाभिमानी कायदा हातात घेउन रस्त्यावर उतरून न्याय मागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला. ते कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
शेट्टी पुढे म्हणाले, ”पुण्यातील मोर्चाने साखर आयुक्तानी 11 नोव्हेंबरला आदेशा काढलेत. 15 दिवसात कारखान्यांनी हिशोब द्यावेत, असे आदेश दिलेत. मात्र ज्या कारखान्यांनी हिशोब दिलेत ते तपासण्यासाठी राज्य सरकारने समिती नेमण्याची गरज असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना वजनकाटा तपासण्याचा अधिकार दिला आहे. वजन काट्याबरोबर कोणतेही छेडछाड करायची नाही, तसे आढळ्यास कारवाई करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिल्याची माहिती शेट्टी यांनी दिले. राज्यातील 12 लाख ऊसतोड मजुरांची नोंदणी करावी. महामंडळाकडून हे मजूर कारखानदारांना पोहचवावेत, असा आरखडा तयार करावा, अशी मागणी केली असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
इधनांचे आणि दळणवळणाचे वाढते दर पाहता साखरेला क्विंटल मागे 3100 वरून ते 3500 रुपये दर द्यावा, इथेनॉलच्या किंमतीत 5 रुपयांची वाढ करावी, एफआरपी कायाद्यातील बदल करून एफआरपीचे सूत्र बदलावे, अशी स्वाभिमानीने मागणी करत येत्या हिवाळी अधिवेशनात ती मंजूर करावी, यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी लाक्षणिक बंद पुकरावा, असे आवाहन शेट्टी यांनी केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला आणि घेतलेल्या भूमिकेमुळे यश आले आहे. राज्यातील जवळपास 80 टक्के साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी दिली.