शाहुवाडी प्रतिनिधी
शाहुवाडी तालुक्यातील पावनखिंड येथील जंगलात झाडाला पट्टा व कात्याने गळफास लावून चिखली तालुका शिराळा येथील वैभव रघुनाथ मगदूम ( वय २५ ) याने आत्महत्या केली. काल सायंकाळी पाच वाजता वैभव आपल्या मोटार सायकलवरून पावनखिंडीत येथे आला होता. त्या परिसरात तो काही काळ थांबला होता. त्यानंतर अंधार पडल्याचा फायदा घेत तेथून बाहेर पडला. मोबाईल बंद असल्याने आणि त्यातच सायंकाळपर्यंत तो घरी न परतल्याने काल मोबाईलच्या लोकेशनवरून या मार्गावरील माणपर्यंत त्याच्या नातेवाईकांनी शोध घेतला. पण तो सापडला नाही. पावनखिंड ते भाततळी यादरम्यान रस्त्यालगत मोटारसायकल लावलेली दिसली. त्याच्या समोरील झुडपातील एका झाडाला वैभवने गळफास घेतलेला आढळले. याची शाहूवाडी पोलीसात नोंद झाली असून आज सायंकाळी मलकापूर ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन झाले नि नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला.
आई-वडिलांचे स्वप्न भंगलं
मृत वैभवचे आई-वडील प्रामाणिक आणि कष्टकरी शेतकरी कुटुंबातील आहेत. आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी त्यांनी अपार काबाडकष्ट करून मुलाला मेडिकल शाखेतून शिक्षण दिले होते. तीन मुलींनंतर जन्माला आलेल्या मुलाचं गोड कौतुक करतच. त्याला घडवण्याचं स्वप्न उराशी धरलं होतं मात्र वैभवने आज आत्महत्या केल्याने आई-वडिलांच्या स्वप्नाची दुर्दशा झाली. आई-वडिलांनी फोडलेला हांबरडा ऱ्हदय पिळवटून टाकत होता.