द्वेषपूर्ण भाषणाच्या आरोपावरून महाराष्ट्र सरकारला निर्देश
मुंबईत 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या प्रस्तावित हिंदू जन आक्रोश सभेच्या कार्यक्रमाचे व्हिडिओग्राफी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी महाराष्ट्र सरकारला देऊन रेकॉर्डिंगची प्रत मागितली आहे. सुप्रिम कोर्टात या संदर्भातील एक याचिका दाखल झाली असून याचिकाकर्त्याने 29 जानेवारी रोजी अशाच एका सभेचे आयोजित करणारी संस्था धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप करून कोर्टात धाव घेतली.
कोणत्याही कायद्याचे उल्लंघन करणारे किंवा सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवणारे कोणतेही द्वेषयुक्त किंवा जातीय तेढ निर्माण करणारे भाषण होणार नाही या अटी वरच न्यायालयाने या कार्यक्रमाला परवानगी दिली असल्याची माहीती सॉलिसीटर जनरल यांनी दिली.
हिंदू जन आक्रोश सभेने 28 जानेवारी रोजी आयोजित 10,000 लोक उपस्थित रॅलीमध्ये मुस्लिमांवर सामाजिक आणि आर्थिक बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आले होते. 29 जानेवारीला भाजप आमदार टी राजा सिंह यांनी हिंदू जन आक्रोश सभेदरम्यान प्रक्षोभक भाषण केले होते. या संदर्भात सुप्रिम कोर्टाने कारवाई करण्याच्या सूचना मागवल्या होत्या.
कोणीही द्वेषपूर्ण भाषणांवर कारवाई करत नसून न्यायालयाला पुन्हा पुन्हा खजिल वाटतील अशा गोष्टी पुन्हा पुन्हा होत आहेत असे निरीक्षण न्यायमूर्ती केएम जोसेफ, न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने नोंदवले आहे. तसेच अशा विधानांना आणि आळा घालण्यासाठी पुढील निर्देशही दिले आहेत.