संतप्त नागरिकांची वीज कार्यालयावर धडक : नेटवर्क सेवा ठप्प : पिण्याच्या पाण्याची समस्या
प्रतिनिधी /वाळपई
सत्तरी तालुक्मयातील ठाणे पंचायत क्षेत्रातील सुरला गावामध्ये गेल्या तीन दिवसांपासून वीजपुरवठा ठप्प झालेला आहे. यामुळे नागरिकांना काळोखात रात्र काढावी लागत आहे. यामुळे संतप्त नागरिकांनी शुक्रवारी वाळपई वीज कार्यालयावर धडक देऊन अधिकाऱयांना धारेवर धरले. जोपर्यंत वीजपुरवठा पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत कार्यालय न सोडण्याचा निर्धार यावेळी ग्रामस्थांनी केला. मात्र आज रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा पूर्वपदावर येणार असल्याचे आश्वासन साहाय्यक अभियंता दीपक गावस यांनी दिल्यानंतर ग्रामस्थ माघारी आहे.
दरम्यान, रिवे येथील वीजवाहिन्या नादुरुस्त बनल्यामुळे सुरल गावातील वीजपुरवठा खंडित होत असल्याचे साहाय्यक अभियंता दीपक गावस यांनी दिली. दोन दिवसांपासून कणकिरे याठिकाणी लाईनमनचा मृत्यू झाल्यामुळे कार्यालयाची सर्व यंत्रणा सदर घटनेच्या कामात व्यस्त होती. यामुळे सदर भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टिकोनातून अडचणी निर्माण झाल्या. यामुळे सुरला गावाला तीन दिवसापासून काळोखात राहावे लागले, असे गावस यांनी यावेळी स्पष्ट केले.
दहा वर्षांपूर्वी राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या प्रयत्नातून रिवे गावातून जवळपास चार किलोमीटर भूमिगत केबल घालून या गावाला वीजपुरवठा करण्यात आलेला आहे. सुरला गाव हा गोवा व कर्नाटक दरम्यानच्या सीमेवर आहे. यापूर्वी सदर गावांमध्ये कर्नाटक भागातून वीजपुरवठा करण्यात येत होता. मात्र दिवसाला केवळ दोन तास वीजपुरवठा मिळत होता. यामुळे प्रतापसिंह राणे यांनी विशेष पुढाकार घेऊन सदर गावासाठी सुमारे चार कोटी खर्चून खास भूमिगत केबल टाकून त्यांना वीजपुरवठा केला होता. त्यामुळे सदर गावातील वीजपुरवठय़ाची समस्या कायमस्वरूपी निकालात आली होती. मात्र गेल्या तीन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे ग्रामस्थांनी संतप्त होत वीज कार्यालयाला धडक देऊन अधिकाऱयांना जाब विचारला.
वीजवाहिन्या जंगलातून जात असल्यामुळे समस्या
ठाणे भागातून रिवे येथे गेलेल्या वीज वाहिन्या नादुरुस्त बनल्या आहेत. सदर वीजवाहिनी जंगलातून गेली आहे. या भागात झाडे पडल्याने तारा तुटलेल्या आहेत. याचे काम आज सकाळपासून हाती घेण्यात आलेले आहे. आज रात्री उशिरापर्यंत कोणत्याही परिस्थितीत गावातील वीजपुरवठा पूर्वपदावर येणार असल्याचे आश्वासन यावेळी दीपक गावस यांनी ग्रामस्थांना दिली.
तीन दिवसांपासून अनेकवेळा वाळपई कार्यालयाशी संपर्क साधून या संदर्भात विचारणा करण्यात येत होती. मात्र दोन तासांनी वीजपुरवठा पूर्वपदावर येईल, अशी आश्वासने दिली जात होती. त्यामुळे नागरिकांनी वीज कार्यालयात घडक दिली, असे संतोष गावकर यांनी सांगितले.
पाण्यासाठी नागरिकांची पायपीठ
वीजपुरवठा बंद झाल्यामुळे सदर ठिकाणी असलेला मोबाईल टॉवर बंद झालेला आहे. तसेच तीन वीज खंडित झाल्यामुळे पाणी पुरवठाही बंद झाल्यामुळे लोकांचे हाल झाले. यामुळे पाण्यासाठी नागरिकांना एक किलोमीटर पायपीठ करून पिण्यासाठी पाणी आणावे लागत आहे, असे यावेळी ग्रामस्थांनी स्पष्ट केले.