शेतकऱयांची मागणी
प्रतिनिधी /जोयडा
जोयडा तालुक्यात सध्या भातकापणी जोरात सुरू आहे. पण ढगाळ वातावरण व गेल्या 4-5 दिवसापासून पाऊस पडत असल्याने कापलेले भात पावसाच्या पाण्याने भिजून जात असल्याने शेतकऱयांना मोठे नुकसान होत आहे. या नुकसानाचा कृषी विभागाने सर्व्हे करून सरकारकडे सादर करावा, अशी मागणी कुंभारवाडा, जोयडा, गांगोडा, अनशी, उळवी, प्रधानी, अवेडा, नागोडा व इतर ग्राम पंचायतमधील शेतकऱयांनी केली आहे.
सध्या बेभरवशाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे कापणी केलेले भात पावसाच्या पाण्याने भिजत चालले आहेत. भाताचे नुकसान होत असल्याचे पाहून शेतकरी फारच हवालदिल झालेला आहे. ज्या-ज्या शेतकऱयांनी भात कापले आहे. त्या सर्वांचे भात गेल्या शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार असे चार दिवस झालेल्या पावसाच्या पाण्यातच आहे. भातास पाणी लागल्याने भात नासाडी होत आहे. अशा भिजलेल्या भाताचे गिरणीमध्ये तांदूळ होऊ शकत नाही. दाणे तुटतात व भुकटी होते. अर्ध्याहून अधिक नुकसान शेतकऱयांना होते. अवकाळी पावसामुळे ही समस्या निर्माण झाली आहे.
तालुक्मयामध्ये 5 हजार हेक्टर भात लागवड
जोयडा तालुक्यातील हवामान व मुबलक पाणी याचा विचार करून भातपिकाची सर्वात जास्त लागवड केली जाते. तालुक्यात 16 ग्राम पंचायती आहेत. या सर्व ग्राम पंचायतींमध्ये 90 टक्के भातपिकाचे उत्पादन घेतले जाते. फक्त गुंद ग्राम पंचायतमध्ये 90 टक्के सुपारीचे उत्पादन व 10 टक्के भात लागवड करतात. सुपारीचे उत्पादन घेणारे सर्वच बागायतदार आर्थिकदृष्टय़ा संपन्न आहेत. सुपारी नगदी पीक आहे. या सुपारीचे उत्पादन क्षेत्र दरवर्षी वाढत चालले आहे. आता जोयडा, कुंभारवाडा, प्रधानी, नागोडा, अनशी, अवेडा या भागातसुद्धा शेतकऱयांचा सुपारीची लागवड करण्याकडे कल दिसत आहे. तालुक्यात सर्वत्र पाऊस पडत असल्याने कापण्यासाठी आलेले भाताची लोंबेसुद्धा भिजल्यामुळे मोडून पडत आहेत. सुमारे 2 हजार हेक्टर प्रदेशात भात कापणी झाली आहे. भात कापणी झाल्यानंतर 2-3 दिवस कापलेले भात वाळत ठेवतात. याच वेळेस पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे.
विमा कंपन्यांचा शेतकऱयांना हात, शेतकरी नाराज
तालुक्यात शेतकऱयांचे पावसामुळे भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. याची नुकसान भरपाई मिळावी म्हणून पीक विमा केलेल्या हजारो शेतकऱयांनी पिकविमा कंपनी अधिकाऱयांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता पण संबंधित अधिकारी शेतकऱयांना समर्पक उत्तरे देत नाही. शेतकऱयांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. यामुळे शेतकरी वर्ग तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
पीक विमा कंपनीचे अधिकारी बोलण्याचे टाळत आहेत. यामुळे शेतकऱयांनी जोयडा कृषी कार्यालयाच्या अधिकाऱयांना संपर्क करून पिकाचे सर्व्हे करा व अहवाल सरकारकडे त्वरित सादर करा, अशी मागणी केली आहे. याबाबत ग्राम पंचायत सदस्यांनी सुद्धा जोरदार मागणी केली आहे. तालुका प्रशासनाने संबंधित अधिकाऱयांना त्वरित आदेश द्यावेत, अशी मागणी जनप्रतिनिधीतून केली जात आहे.
याबाबत साहाय्यक कृषी निर्देशक जोयडा तालुका पी. आय. माने यांना विचारणा केली असता ते म्हणाले, तालुक्यात 3-4 दिवसापासून पाऊस पडत आहे. यामुळे भातपिकाचे नुकसान झाले आहे. याचे सर्व्हे कार्य लवकरच सुरू करत आहोत.