भारताकडून निर्णयाचे स्वागत
वृत्तसंस्था/ ओटावा
कॅनडा सरकारने भारतीय विद्यार्थ्यांच्या डिपोर्टेशनला स्थगिती दिली आहे. 700 भारतीय विद्यार्थ्यांनी कॅनडातील शिक्षण संस्थांमध्ये बनाटव प्रवेशपत्र जमा केल्याचा आरोप होता. याप्रकरणी या विद्यार्थ्यांचे डिपोर्टेशन करण्याचा निर्णय यापूर्वी कॅनडा सरकारने घेतला होता.
भारतीय अधिकाऱ्यांनी अलिकडच्या दिवसांमध्ये कॅनडाच्या सरकारसमोर भारतीय विद्यार्थ्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी मागील आठवड्यात या विद्यार्थ्यांना शिक्षा करणे चुकीचे ठरणार असल्याचे वक्तव्य केले होते.
कॅनडात सुमारे 700 भारतीय विद्यार्थ्यांना कथित स्वरुपात बनावट प्रवेशपत्र जमा केल्याप्रकरणी डिपोर्टेशनचा इशारा देण्यात आला होता. यानंतर भारताने कॅनडाच्या सरकारसमोर हा मुद्दा उपस्थित केला होता. विदेशमंत्री जयशंकर यांनी कॅनडाच्या विदेश मंत्र्यांशी याप्रकरणी संवाद साधला होता. भारत सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर कॅनडा सरकारने मानवीय दृष्टीकोन अवलंबून या विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. कॅनडातील खासदारांनीही या विद्यार्थ्यांना समर्थन दर्शविले आहे. कॅनडा आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे तेथील मंत्री सीन फ्रेजियर यांनी म्हटले आहे