सिंधुदुर्गनगरी /प्रतिनिधी–
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सवास आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन जिल्हा नियोजन सभागृहात मुख्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी सामुहिक राष्ट्रगीत गायन केले. यावेळी पोलीस बँड पथकाने देशभक्तीपर गितांची धुन वाजवून सर्वांची मने जिंकली. मुख्य आकर्षण ठरलेल्या या पथकाने देशप्रेमाचे वातावरण निर्माण केले.
यावेळी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, व इतर अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.