अन्यथा स्कूल समोर ठिय्या आंदोलन करू : – पालकांचा बैठकीत निर्णय
म्हापसा : विद्याप्रबोधिनीच्या हायस्कूलची नव्याने उभारण्यात येणारी इमारत कचरा प्रकल्पाच्या बाजूलाच असून येथे पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत, ते वर्ग बंद करून आठ दिवसांत पूर्वीच्याच इमारतीत भरवावे. अन्यथा सर्व पालक वर्ग याविरोधात याविऊद्ध याचिका दाखल करण्याचा इशारा पालक राजेश दाभोलकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी शंकर पोळजी आदी पालक येथे उपस्थित होते. या प्रकाराबाबत पालप अजिबात तडजोड करणार नाही. याविऊद्ध एक तर उच्च न्यायालयाचे दार ठोठावू किंवा शाळेसमोर ठिय्या आंदोलन करू, असे दोन पर्याय आहेत, असे दाभोलकर म्हणाले. येत्या सोमवारी पुन्हा सर्व पालक एकत्र येऊन याबाबत बैठक घेणार आहे. याबाबत आता आरोग्याची तपासणी करणे गरजेचे आहे. 350 विद्यार्थ्यांसाठी एकच शौचालय आहे. आरोग्य खात्याने यासाठी नाहरकत दाखला कसा काय दिला. एक जरी विद्यार्थी आजारी पडला तर व्यवस्थापनाविरोधात तक्रार केली जाईल. पुढील महिन्यात शाळेचे स्थलांतर होते, असे सांगितले जाते. याबाबत पालकांना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. नाहक विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळू नका, असे सूचित करण्यात आले.
आमच्या मुलांना पूर्वीच्याच ठिकाणी शिकवा
शाळा सदर इमारतीच्या बाजूलाच मोठा कचरा प्रकल्प आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाची भेट घेऊन पालकांनी मुलांचे वर्ग या ठिकाणी स्थलांतर करू नका, असे सांगितले. यावर विचार करून आमच्या मुलांचे वर्ग पूर्वीच्याच ठिकाणी भरवावे, असे व्यवस्थापनाला पालकांनी सूचित केले. मात्र व्यवस्थापनाने कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही, असे पालक हर्षदा सावंत यांनी सांगितले.
आरोग्याची जबाबदारी कोण घेणार? : शंकर पोळजी
यवस्थापन विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळत आहे, असा आरोप शंकर पोळजी यांनी केला. मुलांच्या आरोग्याला धोका पोचल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? हे शाळेच्या प्रशासनाने स्पष्ट करावे. विद्याप्रबोधिनीचा हा निर्णय चुकीचा आहे. नऊ टन कचऱ्याची या प्रकल्पात विल्हेवाट लावली जाते. यामुळे 350 विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर्याने दखल घेऊन याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी शंकर पोळजी यांनी केली.