मुस्लीम बांधवांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी महमद पैगंबरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यामुळे मुस्लीम बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तेव्हा त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी सोशल डेमॉपेटीक पार्टीच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या दोघांच्या वक्तव्यामुळे इस्लामिक देशांनी भारतीय वस्तूंवर निर्बंध लागू केले आहेत. या प्रकारामुळे भारताची छबी आंतरराष्ट्रीय पातळीवर खराब झाली आहे. त्यामुळेच वस्तूंचे दर वाढले आहेत. सामान्य माणसाला जीवन जगणे कठीण बनले आहे. भारत देश हा आर्थिकदृष्टय़ा कमकुवत झाला आहे. असे प्रकार टाळण्यासाठी अपशब्द वापरणाऱयांवर कठोर कारवाई करावी, असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी आबिद खान यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.