प्रतिनिधी/बेळगाव
अथणी तालुक्यातील रेणुका शुगर्स फॅक्टरीमुळे त्या परिसरातील पाणी दूषित झाले आहे. या पाण्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. तेव्हा तातडीने या फॅक्टरीवर कारवाई करावी अशी मागणी अथणी तालुक्यातील देबदापट्टी गावातील तसेच परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.