समाधानी गुंतवणूकदारांच्या समुदायात सामील व्हा!
प्रतिनिधी /बेळगाव
अल्पावधीत स्थिरावलेली व नित्य नवीन जनहितकारी गुंतवणूक योजनांद्वारे प्रसिद्धीस आलेली तरुण भारत सौहार्द सहकारी नियमित ग्राहकांच्या वाढत्या विश्वासाला पात्र ठरत असून अधिकाधिक ठेवीदारांचे आर्थिक गुंतवणूक केंद्र ठरत आहे.
‘वर्धिष्णू’ ही मुदतठेव योजना, ‘आनंदवर्धिनी’ ही मासिक उत्पन्न योजना, ‘लक्ष्मीवृद्धी’ पुनर्ठेव योजना, ‘सुखदा’ रिकरिंग योजना, तसेच 81 महिन्यात शतप्रतिशत ही दामदुप्पट योजना अशा विविध योजनांतून ठेवीदार सुरक्षित, आकर्षक व्याज दराद्वारे उद्दिष्टे गाठू शकणार आहेत.
‘वर्धिष्णू’ व ‘लक्ष्मीवृद्धी’ या योजनेंतर्गत एका वर्षासाठी 9 टक्के, दोन वर्षांसाठी 9.5 टक्के, तीन वर्षांसाठी 10 टक्के व्याजदर व ज्ये÷ नागरिकांना 00.50 टक्के अधिक व्याजदराचाही लाभ उठविता येतो. सातत्याने ग्राहकोपयोगी योजनांचा विचार करणाऱया तरुण भारत सौहार्द सहकारीला मिळणारा भरघोस प्रतिसाद तिच्या प्रगतीचे निर्देशक ठरत आहे. अधिक माहितीसाठी तरुण भारत सौहार्द सहकारी नियमित, 3524 नार्वेकर गल्ली, बेळगाव फोन 0831-2424777 किंवा मोबाईल क्रमांक 9108540877 या क्रमांकावर संपर्क साधावा.