मुंबई : देशातील पाचवी सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान सेवा देणारी कंपनी टेक महिंद्रा यांनी आगामी पाच वर्षांमध्ये गुजरातमध्ये 3,000 लोकांची नियुक्ती करणार असल्याची घोषणा केली आहे. कंपनीने सक्षम आयटी सेवा देण्यासाठी योजना आखली असून गुजरात सरकारसोबत करार करण्यात आला असून त्यावर स्वाक्षरीही करण्यात आली असल्याची माहिती आहे.
करार ठरणारा फायद्याचा : सीईओ
कंपनीचे सीईओ सी पी गुरनानी यांनी म्हटले, की हा करार कंपनीला उद्योग क्षेत्रात पुढे जाण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. आयटी सेवा जास्तीत जास्त सक्षम करण्यावर आपला भर राहणार असल्याचा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला आहे.