शाब्बास संजय साबळे शाब्बास, गाडीचा चालकही निघाला स्विपर,
प्रतिनिधी/ सातारा
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी अचानक तहसीलदारांची बैठक बोलवली होती. त्या बैठकीसाठी महाबळेश्वरच्या तहसीलदार श्रीमती सुषमा पाटील यांनी खाजगी गाडी घेऊन आल्या. ही गाडी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सकाळपासून उभी असल्याची बाब सामाजिक कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी वाहतूक शाखेकडे तक्रार केली. खाजगी गाडीवर अंबर दिवा लावता येत नाही. अंबर दिवा लाऊन गाडी कशी आली या तक्रारीवरुन वाहतूक शाखेचे संजय साबळे यांनी कारवाई केल्यामुळे शाब्ब्बास संजय साबळे शाब्बास असे सातारकर म्हणत आहेत.
अंबर दिवा लावण्यासाठी नियमावली आहे. त्या नियमावलीनुसार अंबर दिवा हा खाजगी वाहनांवर लावता येत नाही. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात महाबळेश्वर तहसीलदार यांच्या नावाची पाटी असलेल्या गाडी क्रमांक एमएच 12 एफएफ 4741 ही उभी होती. ही खाजगी गाडी असल्याने त्या गाडीवर अंबर दिवा कसा?, चालक कोण आहे?, याची चौकशी सामाजिक कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे यांनी केली. त्यावरुन त्यांनी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांच्याकडे तक्रार केली. वाहतूक शाखेच्या कर्मचाऱयांना त्यांनी सूचना दिल्या. वाहतूक शाखेचे संजय साबळे यांच्यासह कर्मचारी तेथे पोहचले. त्यांनी गाडीच्या कागदपत्रांची तपासणी केली. अंबर दिवा लावल्याप्रकरणी त्या गाडीच्या चालकावर कारवाई केली.
दरम्यान, चालक हा चालक नसून तो स्वीपर असल्याचीही बाब समोर आल्याने त्याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यत पुढची कार्यवाही नेमकी कार्यवाही करण्यात आली हे समजू शकले नाही.
साताऱयात उतरवली जाते अधिकाऱयांची मिजास
सातारा शहरात ऐनकेन प्रकारे अनेकवेळा अधिकारी व सेलिब्रिटी येतात. यावेळी काही अधिकारी बेकायदेशीरपणे अंबर दिवा लावतात. या वाहनांवरील दिवे काढण्याचे काम साताऱयात अनेकवेळा झालेले आहेत. याची सुरुवात तत्कालीन शहर पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी केली होती. त्यानंतरही अनेक कारवाया करत अधिकाऱयांची मिजास उतरवली होती. आता महाबळेश्वर तहसीलदारांच्या खासगी गाडीवरील अंबर दिवा काढण्यात आला आहे. ही कारवाई करणाऱया वाहतूक शाखेच्या संजय साबळे यांनी अभिनेते अमिर खान यालाही वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड केला होता.
अधिकाऱयांनी आता चमकोगिरी थांबवावी
शासनाच्या नियमाची पायमल्ली करणाऱया तहसीलदार खाजगी गाडीवर अंबर दिवा लावण्याचे कारण काय. महाबळेश्वर तहसीलचा कारभार सांभाळला तेव्हापासून त्यांनी फक्त चमकोगिरी केली. तसेच अनधिकृत बांधकामांना अभय दिले. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच पाचगणीच्या एका शाळेवर दरड कोसळून 200 मुलांचा जीव धोक्यात आला होता. मात्र त्याकडे तहसीलदारांनी दुर्लक्ष केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली होती. वरिष्ठ अधिकाऱयांनी कडक कारवाई केली पाहिजे अन्यथा लोकजनशक्ती पार्टी अशा अधिकाऱयांना धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही.