लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सोमवारपासून सुरूवात झालेली असतानाच राज्य विधीमंडळाचे विधानसभा निवडणूकपूर्वीचे शेवटचे अधिवेशन गुरूवारपासून सुरू होत आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या अयपशाचे भाजपकडून लोकसभानिहाय जोरदार चिंतन सुरू आहे, शिवसेनेच्या वर्धापन दिनी शिवसेना नेते रामदास कदम यांनी तसेच भाजप विचाराच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्यावऊन केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी महायुतीत राहील का याबाबत सध्या तरी संभ्रम आहे. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान होत असून लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे आणि पवार गटात असलेली अस्वस्थता लक्षात घेता या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
अजित पवार जरा उशिरा महायुतीत आले असते तर आम्हाला अधिकची मंत्रीपदे मिळाली असती, असे वक्तव्य शिवसेना नेते रामदास कदम यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनी केले आणि त्यानंतर महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीत चांगलीच जुंपल्याचे बघायला मिळाले. 2 जुलै 2023 रोजी शिंदे -फडणवीस सरकारमध्ये अजित पवार सामील झाले होते. राष्ट्रवादीतील दिग्गज आणि त्या त्या भागातील प्रस्थापित नेते अजित पवारांसह सरकारमध्ये सामील झाले. त्यात दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धर्मराव बाबा अत्राम, धनंजय मुंडे हे मंत्री झाले.
मात्र या सर्व मंत्र्यांच्या लोकसभा मतदार संघात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार निवडून आलेला नाही. अपवाद फक्त आदिती तटकरे यांचा आहे. लोकसभा निवडणुकीत या सर्व नेत्यांना लोकांनी त्या त्या भागात नाकारल्याचे समोर आले आहे. अजित पवार महायुतीत इन झाल्यानंतर सुरूवातीला एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री पद जाणार आणि अजित पवार हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार? अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याच्या अटीवरच महायुतीत घेतल्याचे तेव्हा चित्र निर्माण केले गेले होते.
आता एक वर्षानंतर त्याच अजित पवारांना युतीत घेतल्याने भाजपला मोठा फटका बसल्याचे विश्लेषण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केले आहे. त्यामुळे अजित पवारांना महायुतीत ठेवायचे की नाही? अजित पवार राहतील की नाही यावऊन आता खल सूरू झाला आहे.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी तर थेट प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत जाण्याचे वक्तव्य केले आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याबाबत मात्र भाजपला सॉफ्ट कॉर्नर असल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची हक्काची पारंपारिक मते शिवसेनेलाच मिळाल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. मुंबई जरी एकनाथ शिंदेंनी गमावली असली तरी ठाण्यात मात्र त्यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. अजित पवारांना मात्र आपले शिरूर, बारामती राखता आले नाही. इतकेच काय मावळमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपले मनापासून काम केले नसल्याचा आरोप खासदार श्रीरंग बारणे यांनी केला. त्यामुळे एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक विश्लेषण तर दुसरीकडे शिवसेनेकडून राष्ट्रवादीला लक्ष केले जात आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील आमदारांमध्ये जरी अस्वस्थता असली तरी शिंदे यांनी त्यांच्या पक्षातील आमदारांना आणि खासदारांना अद्याप एकसंध ठेवले आहे. भाजपकडून सर्व्हेच्या नावाखाली शिवसेना उमेदवारांचे तिकीट कापल्याचा आरोप रामटेकचे माजी खासदार कृपाल तुमाणे यांनी केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीच सर्व्हेच्या नावाखाली आपले तिकीट कापल्याचा आरोप केला तर रामदास कदम यांनी देखील आमचा उमेदवार जाहीर झाला रे झाला की लगेच भाजपवाले आमची जागा, आमची जागा म्हणून ओरडतात. त्यामुळे आता भाजपला महायुती टिकवताना केवळ स्वत:चा विचार न करता मित्रपक्षांचा सुध्दा विचार करावा लागणार आहे, कारण एकीकडे भाजप अजुनही पराजयाचे चिंतन करत असताना तिकडे शरद पवार यांनी थेट सहा महिन्यात राज्यातील सरकार बदलणारच असा दावा करत विधानसभेसाठी श•g ठोकला आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या भूमिकेचा भाजपला मराठवाडा आणि विदर्भात बसलेला फटका लक्षात घेता, विधीमंडळाच्या शेवटच्या पावसाळी अधिवेशनानंतर अनेकजण पक्षांतर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. fिवधान परिषदेसाठी उमेदवारांची घोषणा करणे ही भाजप आणि शिवसेनासाठी मोठी डोकेदुखी आहे. अजित पवारांनी आपल्या पत्नीला राज्यसभेवर पाठविल्याने आता अजित पवार परिषदेवर कोणाला पाठवतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. लोकसभेत समाधानकारक यश न मिळाल्याने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत अस्वस्थता आहे, नरहरी झिरवळ यांनी नाशिक शिक्षक मतदार संघात आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाऊन मंत्री झालेले छगन भुजबळ यांनी मी राष्ट्रवादीसोबत आहे, अजित पवारांसोबत नाही असे वक्तव्य केल्याने भुजबळ हे कधीही बंडाची मशाल हातात घेण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी स्थापनेच्या काळात पक्षाचा महिला चेहरा असणाऱ्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांता पाटील यांनी भाजपचा राजीनामा देत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. पुण्यातील एफसी रोडवरील ड्रग्ज प्रकरण गाजत असताना राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी थेट भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या काळातच पुण्यात अंमली पदार्थ, हप्ता वसुली वाढले असून, दादांचे या सगळ्या गोष्टींना छुपे समर्थन असल्याचा आरोप केला आहे.
एक वर्षापूर्वी पुण्याचे पालकमंत्री घेण्यासाठी दोन दादांमध्ये स्पर्धा लागलेली होती, मात्र आता पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी ढकलण्यातही स्पर्धा लागली असून, येत्या 2 नोव्हेंबरला राष्ट्रवादी महायुतीत सहभागी झालेल्याला एक वर्ष पूर्ण होणार आहे. वर्षभरापूर्वी महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घेतलेले दादा आणि दादांचा पक्ष आता शिवसेना आणि भाजपला नकोसा झाला आहे.
प्रवीण काळे