प्रवासी-विपेत्यांमध्ये क्षुल्लक कारणावरून घडली घटना
प्रतिनिधी /बेळगाव
रेल्वेप्रवासी व रेल्वेत भेळ, वडापाव विकणाऱया विपेत्यांमध्ये हाणामारीची घटना घडली. शुक्रवार दि. 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी रेल्वेस्थानकासमोर घडलेल्या या घटनेनंतर परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. क्षुल्लक कारणावरून हा प्रकार घडल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
यासंबंधी रात्री उशिरापर्यंत कॅम्प पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. घटनेची माहिती समजताच कॅम्पचे पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. प्रवाशांना मारहाण करणाऱया काही विपेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शुक्रवारी दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास गोरखपूरहून बेळगावला सुतार कामासाठी आलेले सहा तरुण रेल्वेतून उतरत होते. त्याचवेळी वडापाव व भेळ विकणारे विपेते घाईघाईने रेल्वेत चढत होते. यावेळी दोघा जणांमध्ये वादावादी झाली. आधी उतरणाऱयांना उतरू द्या, त्यानंतर तुम्ही चढा, घाई केल्यामुळे महिलांना धक्का लागतो, असे गोरखपूरच्या तरुणांनी सांगितले.
दोन तरुण किरकोळ जखमी
क्षुल्लक वादावादीनंतर हा प्रकार तेथेच संपला होता. रेल्वेस्थानकाबाहेर थांबलेल्या गोरखपूरच्या तरुणांना अडवून आम्हाला शिवी का दिला? अशी विचारणा करीत विपेत्यांनी त्यांना मारहाण केली असून या घटनेने परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. मारहाणीत दोन तरुण किरकोळ जखमी झाले आहेत.
मारहाण करणाऱया विपेत्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी हिंदू संघटनांचे कार्यकर्ते पोलीस स्थानकात पोहोचले. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. कॅम्प पोलीस पुढील तपास करीत आहेत.