शाहजहांपूर : उत्तरप्रदेशच्या शाहजहांपूर येथे दाट धुक्याच्या स्थितीदरम्यान भरधाव ट्रकने टेम्पोला टक्कर मारली आहे. या दुर्घटनेत टेम्पोतून प्रवास करणाऱ्या 12 भाविकांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व भाविक मदनापूर येथून गंगास्नानासाठी ढाई घाट येथे जात होते. मृतांमध्ये तीन महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. दुर्घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अशोक कुमार मीणा यांनी दिली आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुर्घटनेप्रकरणी दु:ख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून मदतकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.
Previous Articleअझीम प्रेमजींकडून मुलांना 1 कोटींची भेट
Next Article मार्चपर्यंत ‘ब्राह्मोस’ची निर्यात सुरू होणार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.