अथणी तालुक्मयातील कूपनलिका, विहिरींचे पाणी झाले खराब
प्रतिनिधी /बेळगाव
अथणी तालुक्मयातील रेणुका शुगर्स या फॅक्टरीमुळे या परिसरातील पाणी पूर्णपणे दूषित झाले आहे. पर्यावरणही खराब झाले आहे. दूषित पाण्यामुळे जमीन देखील खराब होत आहे. याबाबत अनेकवेळा संबंधित साखर कारखान्याकडे तक्रार केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. तेंव्हा तातडीने आता तुम्हीच पावले उचला, अशी मागणी अथणी तालुक्मयातील दबदापट्टी आणि इतर गावांतील नागरिकांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रेणुका शुगर्समुळे आमची शेतजमीन खराब होत चालली आहे. या कारखान्यातील रासायनिक पाणी उघडय़ावरच सोडण्यात येत आहे. ते पाणी जमिनीमध्ये झिरपून कूपनलिका व विहिरींतील पाण्यामध्ये मिसळत आहे. त्यामुळे पाणी पिणेदेखील धोकादायक बनले आहे. तेंव्हा याचा गांभीर्याने विचार करून संबंधित कारखान्याला समज द्यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यापूर्वी तहसीलदार तसेच पीडीओंनाही निवेदन देण्यात आले. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी हणमंत जाधव, एस. के. साळुंखे, नामदेव जाधव, बाळकृष्ण खोत, जोतिबा साळुंखे, विश्वनाथ जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.