प्रतिनिधी/ वाळपई
सत्तरी तालुक्मयाचे अनेक भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात सुरू असलेल्या बेकायदा चिरेखाणीच्या विरोधात गोवा सरकारच्या खाण व भूगर्भ संचालनालयाने भरारी पथकाची स्थापना केलेली आहे. याची अंमलबजावणी आज रविवार 11 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या भरारी पथकाच्या माध्यमातून सत्तरी तालुक्मयातील बेकायदा खाणांवर नजर ठेवण्यात येणार असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांनी याचे स्वागत केले आहे सदर भरारी पथक खरोखरच बेकायदा चिरेखाणीवर कारवाई करण्यास यशस्वी ठरेल का? असा सवाल व्यक्त केलेला आहे.
सत्तरीत गेल्या दहा वर्षांपासून अनेक भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात बेकायदेशीर चिरेखणींचा व्यवसाय सुरू आहे. चिरेखणीवर कायदेशीर कारवाई करण्यास खाण व भूगर्भ संचालनालय, पोलीस यंत्रणा उपजिल्हाधिकारी मामलेदार कार्यालय पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. यामुळे प्रचंड प्रमाणात पर्यावरणाची हानी होताना दिसत आहे. या बेकायदा खाणींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अनेकवेळा स्थानिका पंचायतीच्या ग्रामसभेच्या माध्यमातून करण्यात आली होती. त्याचप्रमाणे या संदर्भाची निवेदने अनेकवेळा संबंधित खात्याच्या अधिकाऱयांना सादर केले होते. मात्र अद्याप कायदेशीर कारवाई करण्यात आलेले नाही.
दरम्यान, याची दखल घेऊन सरकारने सत्तरी तालुक्मयातील बेकायदा चिरेखाणीवर विशेष नजर ठेवण्यासाठी भरारी पथकाची स्थापना केलेली आहे. या भरारी पथकामध्ये खाण व भूगर्भ संचालयाचे नियुक्त अधिकारी, सत्तरी तालुक्मयाचे मामलेदार, उपजिल्हाधिकारी, पोलीस खात्याचे स्थानिक निरीक्षक, स्थानिक पंचायतीचे तलाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी यांची विशेष नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदर पथक बेकायदा चिरेखाणीच्या व्यवसायावर लक्ष ठेवणार आहे. बेकायदेशीर चिरेखणीचा व्यवसाय ज्या ठिकाणी सुरू आहे, याची माहिती भरारी पथकाला मिळाल्यानंतर सदर पथक ताबडतोब सदर ठिकाणी कारवाई करणार आहे.
या संदर्भात खाण व भूगर्भ संचालनालयाच्या संचालकांनी जारी केलेल्या आदेशामध्ये भरारी पथकाच्या माध्यमातून बेकायदेशीर चिरेखाणींच्या व्यवसायाला आळा घालणार आहे. या संदर्भाची माहिती संबंधित खात्याला मिळाल्यानंतर ताबडतोब या संदर्भाची माहिती भरारी पथकाला देण्यात यावी. त्यानंतर बेकायदा व्यवसायावर धाड घालून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे सदर आदेशात स्पष्ट करण्यात आलेले आहे. या पथकाच्या माध्यमातून सत्तरी तालुक्मयात मोठय़ा प्रमाणात सुरू असलेल्या बेकायदा चिरेखाणीच्या व्यवसायाला मोठय़ा प्रमाणात आळा बसावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केलेली आहे.
भरारी पथक म्हणजे निव्वळ धूळफेक?
दम्यान काही नागरिकांनी भरारी पथकाची स्थापना म्हणजे जनतेच्या डोळय़ात धुळ फेकण्यासारखाच प्रकार असल्याचे टीका केलेली आहे. कारण ज्या पथकामध्ये अधिकाऱयांची नियुक्ती केलेली आहे सदर अधिकाऱयांना बेकायदा खाणींवर कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार आहेत, असे असताना यापूर्वी त्यांनी का कारवाई केली नाही, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलेला आहे. येणाऱया काळात या भरारी पथकाची खरी नि÷ा कारवाईच्या माध्यमातून दिसणार आहे.