जिल्हाधिकाऱयांनी केली अधिकाऱयांना सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हाधिकारी कार्यालय आता पूर्णपणे पेपरलेस करण्याबाबत जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी पाऊल उचलले असून याबाबत पेपरलेस यंत्रणा कार्यान्वित करावी, असा आदेश अधिकाऱयांना दिला आहे. त्यामुळे आता यापुढे जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व काम ऑनलाईन व संगणकाद्वारे होणार आहे.
पेपरलेस कार्यालय प्रणाली लागू करण्यासाठी सर्व ती यंत्रणा उपलब्ध करण्यात येणार आहे. संगणकाबरोबरच इतर कोणत्या सुविधा आहेत; त्या तातडीने कार्यान्वित कराव्यात. कर्मचाऱयांना प्रशिक्षणदेखील देण्यात यावे, असे त्यांनी सांगितले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व फायली, कागदपत्रे आता याच प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
कार्यालयातील सर्व विभागाच्या प्रमुख अधिकाऱयांना तसेच इतर कर्मचाऱयांना काटेकोरपणे याची अंमलबजावणी करावी यासाठी आतापासूनच सर्वांनी तयारीला लागावे. गरज पडल्यास कर्मचाऱयांना मदत करण्यासाठी तांत्रिक सल्लागारही नेमले जावेत, असे त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे यापुढे आता जिल्हाधिकारी कार्यालय पेपरलेस बनणार आहे.