बेळगावात कर्नाटक विधिमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून भरणार आहे. यात विविध विषयांवर चर्चा होणार असून आरक्षणाचा विषयही महत्त्वाचा ठरणार आहे. दुसरीकडे आगामी निवडणुकीसाठी विविध पक्षांची तयारी वेग घेते आहे.
मन्दौस चक्रीवादळाच्या प्रभावामुळे बेळगावसह कर्नाटकात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्मया सरी कोसळल्या आहेत. गारठय़ामुळे रोगराईचे संकट वाढले आहे. खासकरून लहान मुले आजारी पडत आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून असे वातावरण तयार झालेले आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने आपले आरोग्य जपणे आवश्यक आहे. 19 ते 30 डिसेंबरपर्यंत कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बेळगावात होणार आहे. प्रशासनाने यासाठी सर्व तयारी केली आहे. नेहमीप्रमाणे अधिवेशनाच्या काळात सुवर्ण विधानसौधबाहेर मोर्चे, आंदोलने, धरणे असणार आहेत. सरकारला पंचमसाली समाजाच्या आंदोलनाला कसे तोंड द्यायचे, याची चिंता लागली आहे. 19 डिसेंबरपर्यंत समाजाला आरक्षण जाहीर झाले नाही तर 22 डिसेंबर रोजी 25 लाख समाजबांधव बेळगावला धडक देणार आहेत, अशी माहिती कुडलसंगम पीठाचे जगद्गुरू जयमृत्युंजय स्वामीजींनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांनी ठरलेल्या मुदतीत आरक्षण जाहीर केले तर 22 डिसेंबर रोजी त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. नहून त्या दिवशीपासून आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. ठरलेल्या मुदतीत मुख्यमंत्री बसवराज बोम्माई ठोस निर्णय जाहीर करण्याची शक्मयता आहे. कारण विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर ठेपलेली असताना एका मोठय़ा समाजाची नाराजी ओढवून घेणे कोणत्याही राजकीय पक्षाला परवडणारे नाही. कायदेशीर व तांत्रिक अडचणी येऊ नयेत याची खबरदारी घेत निर्णय घेतला जाणार आहे, असे यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी वारंवार जाहीर केले आहे. पंचमसाली समाजाचे आंदोलन तीव्र होण्याआधीच सरकारकडून दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. बेळगावला अधिवेशन म्हटले की शेतकरी, कामगार संघटना, शिक्षक संघटना, आदी वेगवेगळय़ा संघटनांची आंदोलने ही ठरलेलीच असतात. खासकरून ऊसदराचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे शेतकरीही आक्रमक होण्याची शक्मयता अधिक आहे.
सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीत तयारीत गुंतलेले आहेत. नेत्यांचे अंतर्गत वाद, रुसवेफुगवे काही थांबता थांबेनात. काँग्रेसमधील डी. के. शिवकुमार व सिद्धरामय्या यांच्यातील वादावर तोडगा काढण्यासाठी एआयसीसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी नवी दिल्ली येथे बैठक बोलाविली होती. आधी सिद्धरामय्या व शिवकुमार यांनी स्वतंत्र बसयात्रा काढण्याचे ठरविले होते. हायकमांडच्या सूचनेनुसार आता दोन्ही नेते एकत्र राज्याचा दौरा करणार आहेत. कर्नाटकात सत्ता मिळवायची असेल तर बेकी बाजूला सारून एकत्र या, असा कानमंत्र हायकमांडने दोन्ही नेत्यांना दिला आहे. जानेवारी पहिल्या आठवडय़ात दोन्ही नेते एकत्र दौरा हाती घेणार आहेत. जानेवारीअखेरपर्यंत 150 उमेदवारांची यादी जाहीर करण्याची तयारीही काँग्रेसने ठेवली आहे. त्यानंतर पक्षाच्या सूचनेवरून दोन्ही नेते स्वतंत्र दौरा करणार आहेत. निवडणूक जिंकण्याच्या व्यूहरचनेचा एक भाग म्हणून हे डावपेच आखले जात आहेत. कारण भाजप नेते नेहमी सिद्धरामय्या व शिवकुमार यांच्यातील प्रति÷ावादावर बोट ठेवून काँग्रेसमध्ये सर्व काही ठिक नाही, असा प्रचार करीत आहेत. हा प्रचार रोखण्यासाठीच एकीचा मंत्र देण्यात आला आहे.
काँग्रेस पाठोपाठ आता कर्नाटक भाजपमधील सुंदोपसुंदीही उफाळून आली आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्यातील दरी रुंदावत चालली आहे. आजवर उघडपणे त्यांच्यातील मतभेद चव्हाटय़ावर आले नव्हते. मुख्यमंत्र्यांनी येडियुराप्पा यांना व्यवस्थितपणे बाजूला सारल्याचा आरोप केला जात आहे. गेल्या आठवडाभरात झालेल्या पक्षाच्या कार्यक्रमांपासून येडियुराप्पा यांनी अंतर राखले आहे. मंगळवारी चामराजनगर येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विकासकामांचे उद्घाटन झाले. व्यासपीठावरील फलकावर येडियुराप्पा यांची छबी दिसून आली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. हा सरकारी कार्यक्रम असल्यामुळे त्यांची प्रतिमा लावली नाही, असे सांगत सारवासारव करण्यात आली असली तरी येडियुराप्पा यांना पक्षाच्या व्यासपीठावर टाळले जात आहे, हे ठळकपणे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यामुळे पक्षाच्या हायकमांडपर्यंत ही गोष्ट पोहोचली आहे. कोणत्याही परिस्थितीत येडियुराप्पा यांना कमी न लेखण्याची सूचना करण्यात आली आहे.
भाजप आणि काँग्रेसला कोणत्याही परिस्थितीत कर्नाटकाची सत्ता मिळवायचीच आहे. निवडणुकीच्या तोंडावर येडियुराप्पा यांच्यासारख्या ज्ये÷ नेत्यांची नाराजी पक्षाला परवडणारी नाही. हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीत नाराजी, बंडखोरीमुळेच भाजपची सत्ता गेली. भाजपमधून बाहेर पडलेले अनेक बंडखोर काँग्रेस व इतर पक्षातून विजयी झाले. त्यामुळे बंडखोरी होऊ नये, याची काळजी घेण्याची सूचना हायकमांडने केली आहे. जर एखादा नेता पक्षावर रुसला तरी त्याची समजूत काढण्याचे धोरण अवलंबिण्यात येणार आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवि यांनी तर आपल्याच पक्षाला उघडपणे इशारा दिला आहे. हुशारीने व एकत्रितपणे वाटचाल केली नाही तर संकटाचा सामना करावा लागणार, असा धोका त्यांनी बोलून दाखविला आहे. ताजे उदाहरण हिमाचल प्रदेशचे डोळय़ासमोर आहे. या राज्यात पक्षाचा गाफीलपणा नडला. कर्नाटकातही त्याची पुनरावृत्ती झाली तर निकाल वेगळा असणार आहे, अशी भीती पक्षातील अनेक नेत्यांना वाटते. त्यामुळे मुख्यमंत्री बोम्माई यांना ज्ये÷ असो वा कनि÷ साऱयांनाच चुचकारण्याचे काम हाती घ्यावे लागणार आहे. येडियुराप्पा विरुद्ध बसनगौडा पाटील-यत्नाळ हा वाद हायकमांड कसा संपवणार, यावरही बऱयाच गोष्टी अवलंबून आहेत.
रमेश हिरेमठ