उच्च, तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन; शिक्षण मंडळ कराडचा शताब्दी सोहळा
प्रतिनिधी/ कराड
देशाची शिक्षण व्यवस्था सक्षम व तरुणांना परिपूर्ण करण्यासाठी 2020 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवीन शैक्षणिक धोरण आखले आहे. भरकटलेल्या विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी बदलत्या शैक्षणिक धोरण कौशल्य विकास ज्ञानावर आधारलेली शिक्षण व्यवस्था जून 2023 पासून अंमलात येणार आहे. या कौशल्य विकास ज्ञानावर आधारलेल्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थी परिपूर्ण व सक्षम होईल. कौशल्य ज्ञानाने विकसित असणारे तरुण केवळ भारतच संपूर्ण जगाला देऊ शकेल. जगात भारत दुसऱया किंवा तिसऱया क्रमांकाची महासत्ता होण्यासाठी देशात कौशल्य विकासावर आधारित शिक्षण व्यवस्था हवी, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्राsद्योग संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले
शिक्षण मंडळ कराड व टिळक हायस्कूलच्या शताब्दी महोत्सव शुभारंभप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी राज्यपाल, टिळक हायस्कूलचे माजी विद्यार्थी राम नाईक होते. खासदार श्रीनिवास पाटील आमदार बाळासाहेब पाटील, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल हुद्देदार, चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी व्हा. चेअरमन श्रीमती अनघा परांडकर, सचिव चंद्रशेखर देशपांडे, सहसचिव राजेंद्र लाटकर, टिळक हायस्कूलचे मुख्याध्यापक गोकुळ अहिरे, शताब्दी महोत्सव माजी विद्यार्थी समितीचे अध्यक्ष ऍड. सदानंद चिंगळे, माजी विद्यार्थी सांस्कृतिक सेवा संघाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद पेंढारकर, आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमात शताब्दी निमित्त तयार करण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन, संस्थेच्या नवीन एनटीए या राष्ट्रीय परीक्षा केंद्राचे उद्घाटन झाले. संस्थेने भगवद्गीता लेखनाचा विश्वविक्रम केल्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतल्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष, अनिल हुद्देदार यांनी संस्थेस तीन लाखाचा धनादेश सुपूर्द केला.
ना. पाटील म्हणाले, बाराव्या शतकापासून अनेक परकीय आक्रमणे देशावर आली. छत्रपती शिवरायांनी ही आक्रमणे लीलया उलथवून लावली. इंग्रजांनी भारताची शैक्षणिक धोरणे बदलली मात्र तरीही भारत शैक्षणिकदृष्टय़ा प्रगत आहे. त्याचे मुळ कारण आमचा विचार, विचार आणि संस्कार आहे. सर्व विश्वाच्या प्रगतीची व मानवतेच्या कल्याणाची आमची शिक्षण प्रणाली इंग्रजांनी संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र ती संपली नाही. बदलत्या स्पर्धेच्या युगात आमचा विद्यार्थी सक्षमपणे उभा राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवीन शैक्षणिक धोरणांची संकल्पना आणली आहे. ती संकल्पना जून 2023 मध्ये प्रत्यक्ष अंमलात येईल. या बदलत्या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थी देशाचा सक्षम नागरिक बनेल, याचा विश्वास आहे.
राम नाईक म्हणाले, लोकमान्य टिळक यांचे नाव घेताच संपूर्ण भारतवासीय नतमस्तक होतात. टिळकांची प्रेरणादायी चरित्र सतत नव्या पिढी समोर रहावे, या उद्देशाने अकरा देशभक्तांनी कराड मध्ये शिक्षण मंडळ या संस्थेची व टिळक हायस्कूलची स्थापना केली. त्याला आज 102 वर्ष पूर्ण झाली याचा सार्थ अभिमान वाटतो. व्यक्तीला जीवनात यशस्वी होण्यासाठी हसत राहा. चांगल्याचे कौतुक करा दुस्रयाचा अपमान करू नका.जे काम कराल ते अधिक चांगले कसे होईल, याचा सतत प्रयत्न करा. या चार गुरुमंत्राचा स्वीकार प्रत्येकाने करावा.
खासदार पाटील म्हणाले, टिळकांच्या स्मृती जपणारी शिक्षण संस्था व टिळक हायस्कूल ही ज्ञान दानाची पवित्र मंदिरे आहेत. आबादी ते शताब्दी असा शिक्षणाचा कालखंड यशस्वीपणे पूर्ण करणारी ही दोन प्रेरणास्थळे आहेत. शिक्षणा बरोबरच देशप्रेमाची धडे देणारी ही शाळा बदलत्या युगात कौतुकास पात्र आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व देशाला पहिले ऑलम्पिक पहिले पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव यांच्यासारखे शेकडो माजी विद्यार्थी देशाचे नाव उंचावत याचा अभिमान वाटतो. कृष्णाकाठावरती शिक्षण मंडळाचा ज्ञान यज्ञ सुरु आहे. या ज्ञान मंदिराची पालखी पुढे नेण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू.
आ.बाळासाहेब पाटील म्हणाले,शिक्षण मंडळाचा व टिळक हायस्कूलचा देशभर नावलौकिक आहे. काळानुसार संस्थेने आधुनिक बदल केले आहेत. याही पुढे संस्था नवनवीन विद्या शाखांची निर्मिती करत आहे. स्पर्धेच्या युगात विद्यार्थी परिपूर्ण होण्यासाठी संस्था व शाळा परिपूर्ण राहील नवनवीन संकल्पना राबवून ही शिक्षण संस्था पुढे घेऊन जाण्यासाठी आपण सर्वजन प्रयत्नशील राहू.
बाळासाहेब कुलकर्णी यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. सचिव चंद्रशेखर देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ.अनिल हुद्देदार यांनी शिक्षण मंडळास देणगी देण्यामागची माझी भूमिका स्पष्ट केली. धनंजय कुलकर्णी व स्वप्ना कुलकर्णी यांनी नांदी सादर केली अभिजित कुलकर्णी व सौ.बाबर यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक, जी. जी. अहिरे यांनी आभार मानले.
फोटो.
ग्रामीण विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी फंड सुरू करा
शिक्षण मंडळ व टिळक हायस्कूल महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रातील नावाजलेली केंद्रे आहेत. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी संस्थेच्या व शाळेच्या अडचणी जाणून घ्या. त्या निश्चितच सोडवू असा निरोप दिल्याचे नामदार चंद्रकांत पाटील यांनी सांगून ग्रामीण भागातून येणाऱया विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी आम्ही भरघोस मदत करू फंड सुरू करा. त्यास सीआरएस फंडातून भरघोस मदत करू. संस्थेने आवश्यक कामांचा प्रस्ताव तयार करावा. त्यास निधी दिला जाईल, असे आश्वासन दिले.
सेकंड पॅरेग्राफ