केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे उद्गार, कदंब पठारावरील साई मंदिराला भारतमातेची प्रतिमा सुपूर्द
प्रतिनिधी /पणजी
आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी, पूर्वजांनी दिलेल्या बलिदानावर, तसेच त्यांनी केलेल्या त्यागावर आज देश उभा आहे. त्यांच्या विषयी प्रत्येकाला आदर असणे गरजेचे आहे. त्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी तसेच त्यांच्या बलिदानामुळे मिळालेले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक आहे, असे उद्गार केंदीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी काढले.
‘75 मंदिरांत भारतमातेच्या 75 प्रतिमा’ या मातृभूमी सेवा प्रति÷ान, गोवाच्या संकल्पाला कदंब पठारावरील साई मंदिराला भारतमातेची प्रतिमा सुपूर्द करून प्रारंभ झाला. या कार्यक्रमात श्रीपाद नाईक बोलत होते. गुरुदास कुंदे आणि रोहिदास (दाद) देसाई या स्वातंत्र्यसैनिकांच्या हस्ते भारतमातेची प्रतिमा साईप्रार्थना मंदिर ट्रस्टचे सचिव हनुमंत कुट्टीकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. याप्रसंगी ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी मंदिर परिसर दणाणून गेला.
साई मंदिरात झालेल्या या सोहळय़ाला ज्ये÷ स्वातंत्र्यसैनिक गुरुदास कुंदे, स्वातंत्र्यसैनिक रोहिदास (दाद) देसाई, डॉ. गोविंद काळे आणि साईप्रार्थना मंदिर ट्रस्टचे सचिव हनुमंत कुट्टीकर आणि मातृभूमी सेवा प्रति÷ानचे सचिव सुरज नाईक हेही उपस्थित होते.
आपल्या राज्याचा, आपल्या देशाचा इतिहास लोकांना ज्ञात असणे आवश्यक आहे. कुणामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, कुणामुळे आपण आज मोकळा श्वास घेऊ शकतो, हे आजच्या पिढीला माहीत असणे गरजेचे आहे. जोपर्यंत आपण राष्ट्रप्रेमाने प्रेरित होणार नाही, तोपर्यंत देश सशक्त होणार नाही. लोकांमधील राष्ट्रप्रेम जागृत करण्याचा मातृभूमा सेवा प्रति÷ान, गोवाचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. लोकांचे त्यासाठी सहकार्य आवश्यक आहे, असे श्रीपाद नाईक पुढे म्हणाले.
भारतमातेचे स्मरण करा : डॉ. गोविंद काळे
लंका जिंकल्यानंतर प्रभू श्रीरामचंद्रने माता, मातृभूमी स्वर्गापेक्षाही श्रे÷ असल्याचे बंधू लक्ष्मणला सांगितले होते, गोवा ही देवभूमी आहे. गोव्याच्या गावागावात मंदिरे आहेत. देवाला नमस्कार करताना मातृभूमी, भारतमातेलाही नमस्कार करा, भारतमातेचे स्मरण करा. भक्तीबरोबर शक्तीचीही उपासना करा, असे आवाहन लेखक आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक डॉ. गोविंद काळे यांनी केले.
मंदिरांमध्ये भारतमातेची प्रतिमा लावण्याचा मातृभूमी सेवा प्रति÷ान, गोवाचा प्रयत्न स्तुत्य असल्याचे ज्ये÷ स्वातंत्र्यसैनिक गुरुदास कुंदे यांनी सांगितले. मातृभूमी सेवा प्रति÷ानचे सचिव सुरज नाईक यांनीही विचार मांडले.
याप्रसंगी गुरुदास कुंदे आणि रोहिदास देसाई या स्वातंत्र्यसैनिकांचा शाल व पारंपरिक समई देऊन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.