हुक्केरीत उभारणार गो-शाळा, 19.4 एकराचे भू-संपादन : प्रस्ताव उच्च न्यायालयात
प्रतिनिधी /बेळगाव
भाकड काळातील गायींचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हय़ात गो-शाळा सुरू केल्या जाणार आहेत. यंदा वर्षअखेर या कामाला चालना दिली जाणार आहे. राज्य सरकारने याबाबत उच्च न्यायालयात प्रस्ताव पाठविला आहे.
यापूर्वी राज्यातील काही भागात गो-शाळांच्या कामांना प्रारंभ झाला आहे. येत्या काळात इतरत्र ठिकाणीही गो-शाळा उभारणीचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे भटक्मया जनावरांची धरपकड थांबणार आहे. शिवाय भाकड आणि भटक्मया गायींचा प्रश्नही मार्गी लागणार आहे.
डिसेंबर अखेरपर्यंत चिक्कबळ्ळापूर, दक्षिण कन्नड, उडुपी, शिमोगा, गुलबर्गा, बेळगाव आदी ठिकाणी गो-शाळा सुरू केल्या जाणार आहेत. यापैकी बेळगावसाठी हुक्केरी तालुक्मयातील बेळवी गावात 19 एकर 4 गुंठे जागा संपादित केली आहे.
पशुसंगोपन खात्याकडून गो-शाळेसाठी भूमिपूजन झाले. त्यामुळे बेळगाव जिल्हय़ात लवकरच गो-शाळा उभी राहणार आहे. जिल्हय़ातील भाकड गायींचा प्रश्न सुटणार आहे. साधारण 200 गायींची क्षमता असणारी गो-शाळा उभारली जाणार असल्याने जिल्हय़ातील गायी ठेवण्याची व्यवस्था होणार आहे. महाराष्ट्रातील गो-शाळांच्या धर्तीवर विकास साधला जाणार आहे. यामध्ये दुधापासून उपपदार्थ बनविणे, गो-आधारित शेती, सेंद्रिय खत, बायोगॅससारखे प्रकल्पही राबविले जाणार आहेत. त्यामुळे गो-शाळेतून काही प्रमाणात उत्पन्नही प्राप्त होणार आहे.
राज्यात गोवंशीय प्राण्यांच्या वाहतुकीवर आणि कत्तलीवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. तरीही काही ठिकाणी प्राण्यांची कत्तलीसाठी चोरटी वाहतूक सुरू आहे. अशांवर गो-शाळा उभारल्यानंतर आळा बसणार आहे.
सुसज्ज गो-शाळा उभारणार
गो-शाळा उभारण्यासाठी हुक्केरी तालुक्मयातील बेळवी गावात 19 एकर 4 गुंठे जागा संपादित केली आहे. लवकरच या ठिकाणी गो-शाळा उभारली जाणार आहे. त्यामुळे भाकड गायींचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. जिल्हय़ातील दूध क्षमता संपलेल्या गायीही या ठिकाणी ठेवल्या जाणार आहेत. यासाठी सुसज्ज गो-शाळा उभारली जाणार आहे.
– डॉ. राजीव कुलेर, उपनिर्देशक, पशुसंगोपन खाते