म्हासुर्ली / वार्ताहर
धामणी नदीवरील आंबर्डे- वेतवडे दरम्यानचा बंधारा पाण्याखाली गेलेला आहे. सध्या धामणे नदीवरील पणोरे, आंबर्डे, सुळे तसेच कुंभी नदीवरील गोठे पूल पाण्याखाली गेल्याने धामणी नदीच्या पश्चिम तिरावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झालेली आहे. जर पावसाचा जोर असाच राहिला तर संध्याकाळपर्यंत गवशी, म्हासुर्ली बंधारा पाण्याखाली जाण्याची दाट शक्यता आहे.