सातारा/प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी औंध येथील बांधीव तळ्याच्या विकास आणि सुशोभीकरण करण्यासाठी तब्बल 40 कोटी चा निधी दिल्यानंतर याच धर्तीवर सातारा नगरपरिषदेस ही शहरातील ७ तळ्याच्या सुशोभीकारण आणि विकासासाठी भरीव निधी द्यावा अशी मागणी माजी नगरसेवक वसंत लेवे यांनी केली आहे.
मराठ्यांची तिसरी राजधानी असलेल्या सातारा शहरात ७ मोठी तळी आहेत. यात प्रामुख्याने मोती तळे, साखर तळे, महार्दार तळे, हत्ती तळे, फुटका तलाव, मंगळवार तळे, गोडोली तळे,आणि पोलीस मुख्यालय परिसरातील दोन तळ्यांचा समावेश होतो.
अधिक वाचा : ‘ओबीसी आरक्षण रद्द करणे हे षडयंत्र’ – फडणवीस
यातील काही तळी खाजगी मालकीची आहेत तर बाकी न प च्या मालकीची ,मात्र अपुऱ्या निधी अभावी या तळ्यांच्या सुशोभीकरण ,डागडुजगी चे काम अद्याप ही झालेले नाही, नगरसेवक वसंत लेवे यांनी स्वखर्चातून मंगळवार तळ्याचे सुशोभीकरण केले मात्र इतर तळी आज ही दुर्लक्षित आहे.
सातारा नप कडे त्या करिता अधिकचा निधी नसल्याने इतिहासाची साक्ष देणारी ही तळी नामशेष होतात की काय अशी अवस्था आहे. या करिता राज्य शासनाने औंध प्रमाणे सातारा शहरास ही विशेष निधी उपलब्ध करून दिल्यास नक्कीच या तळ्याचे रुपडे पालटण्यास वेळ लागणार नाही.