सांगली: जिल्ह्यातील सर्व युवा सेना पदाधिकारी, सहकारी व युवासैनिकांसह शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सोबत जाण्याचा निर्धार केला आहे. युवा सेनेचे सचिन कांबळे बोलताना म्हणाले, मी गेल्या पंधरा वर्षांपासून या जिल्ह्यात शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ आहे. गेल्या दोन वर्षांपासून युवासेनाचा पदाधिकारी म्हणून काम करत आहे. ताकद राहू दे न्याय पण दिला नाही. काय काम दाखवायचं होतं, असा सवाल त्यांनी यावेळी केला.
आम्ही कधीच कशाचीही अपेक्षा न ठेवता दिलेल्या पदाचा कुठेही कधीही गैरवापर न करता योग्य पद्धतीने संगटना वाढीसाठी तन-मन-धन लावून प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. हे जिल्ह्यातील आणि संघटना पातळीवरील सर्व पदाधिकारी जाणतात.परंतु माझ्या खालच्या लोकांना जर न्याय मिळणार नसेल आणि त्यांची त्यांच्या गावातील मला या कालखंडात पक्षाने व वरीष्ठ पातळीवरील नेत्यांनी संघटनेचे पदाधिकारी म्हणून मी कुणावरही आरोप किंवा टिका करणार नाही. परंतु वरीष्ठ पातळीवरील नेत्यांनी थोडेसे लक्ष देणे गरजेचे होते. कारण नवीन येणाऱ्या लोकांना ताकद देणं गरजेचं असतं आणि ते जर होणार नसेल तर आम्ही खाली भागातील कामे शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना होत नसतील. तालुका प्रमुखासारख्या महत्वाच्या पदावर कार्यरत असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी दोन-दोन वर्षे खोट्या गुन्ह्यात अडकून मोका अंतर्गत कारवाई भोगायची आणि आम्ही ते युवासेना प्रमुख, युवासेना सचिव शिवसेना सचिव संबंधित मंत्री यांच्याकडे हेलपाटे घालून सुद्धा होत नसेल तर संघटना मजबूत कशी करायची. लोक कशी गोळा करायची हा माझा वरीष्ठ पातळीवरील नेत्यांना सवाल आहे. शिवसेना भवनला जाऊन आगोदर मेसेज देऊन केबिन बाहेर तास दोन तास थांबून सुध्दा युवासेनेचे सचिव जर जिल्हा प्रमुखांना वेळ देत नसतील तर यापेक्षा दुर्दैव आमचं म्हणावं अशी भावना शिवसेनेचे युवा सेना अध्यक्ष सचिन कांबळे यांनी व्यक्त केली.
हे ही वाचा : सातारा येथील सराफ व्यवसायिकाची १२ लाखाची फसवणूक
लाखो रुपये पदरचे खर्च करून जर भाषणात जिल्हा युवा अधिकारी लक्षात राहत नाही. मग आमचं काय राहीलं. याच कारणामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील होत असून माझे सर्व पदाधिकारी आणि सहकारी व युवासैनिकांसह आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर त्यांनी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारांचे शिवसरकार आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीतले शिवसैनिकांना न्याय देणारे सरकार या संकल्पनेवर विश्वास ठेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे. असे म्हणत सचिन कांबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.