सरकारी योजनेच्या अंतर्गत सर्वसामान्यांना आणण्याचा प्रयत्न
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सरकारची योजना आयुष्मान भारत आरोग्य संरक्षण (आयुष्मान भारत हेल्थ कव्हर) चा विस्तार आता जवळपास 40 कोटीपेक्षा अधिक लोकांपर्यंत पोहोचविणार आहे. याप्रकारे भारत जगातील पहिली व्यापक आरोग्य विमा योजना सुरु करण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहे.
सध्याच्या कालावधीत 50 कोटीपेक्षा अधिकजण (10.74 कोटी कुटुंब) अगोदरच आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना (एबी-पीएमजेएवाय) च्या अंतर्गत जोडले आहेत. ही योजना प्रत्येक कुटुंबीयांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत वार्षिक आरोग्य संरक्षण प्रदान करत आहे. सरकारकडून आता या योजनेचा विस्तार केला जाणार आहे.
काही महिन्यांतचराज्यांमध्ये पायलट प्रोजेक्ट
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (एनएचए) च्या गवर्निग बोर्डाने चालू महिन्याच्या सुरुवातीला एका बैठकी दरम्यान प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. एनएचए, एबी-पीएमजेएवायसाठी कार्यालयीन एजन्सी आहे. एनएचए आता आगामी काही महिन्यांमध्ये संबंधीत राज्यांमध्ये पायलट प्रोजेक्ट सुरु करण्याची योजना बनवत आहे. ज्यामध्ये संपूर्ण भारतामध्ये सदरच्या योजनेचा विस्तार करण्यात येणार आहे.
30 टक्के लोकसंख्या विम्यापासून वंचित
सध्याच्या काळात आयुष्मान भारत आरोग्य विमा योजना आणि राज्य सरकारच्या विस्तार योजनांसाठी लोकसंख्येच्या 51 टक्के म्हणजे जवळपास 69 कोटी व्यक्तींना व्यापक हॉस्पिटलायझेशनचे संरक्षण दिले जाते. 25 कोटी व्यक्ती सामाजिक आरोग्य विमा, खासगी स्वऐच्छिक आरोग्य विम्याने संरक्षित आहेत. मात्र 30 टक्के लोकसंख्या आरोग्य विम्यापासून वंचित आहेत.