टाेप/वार्ताहर
कासारवाडी ता. हातकणंगले येथील गावशिवारात जाणारे रस्ते गेल्या काही दिवसापासून बंद केले असून ते करावे करावे यासाठी अर्जुन जाेंधळे या शेतकर्यांने कासारवाडी ग्रामपंचायतीच्या दारात बैल बांधला आहे. त्यामुळे याची गावात सर्वत्र चर्चा सुरु आहे.
दरम्यान, पारंपारिक पध्दतीने शेतीवर गावातील शेतकरी उपजिविका करत आहेत. काही दिवसांपासून कासारवाडी पासून अंबपवाडीकडे जाणार्या राेडच्या पश्चिमेला ३५० एकर शेतीत जाणारे रस्ते हे वहिवाटीचे आहेत. काही दिवसांपासून ते रस्ते बंद केले आहेत. पण त्या शेतकर्यांचा बराेबर ग्रामस्थांनी चर्चा केली असता या वाटा आमच्या वैयक्तिक जागेतून आहेत. सदर वाटेवर तुमचा आधिकार नाही असे सांगितले आहे. त्यामुळे अंतर्गत भागातील शेतकर्यांना शेतात जाता येत नाही. त्यामुळे रब्बी पिकाची मशागत पेरणी खोळंबली आहे. त्यामुळे बंद केलेले रस्ते खुले करुन त्याची शासकीय दफ्तरी नाेंद करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान यावर ताेडगा काढू असे आश्वासन मारुती खाेत व उपसरपंच नेताजी चेचरे यांनी दिल्यानंतर दिल्यानंतर बांधलेला बैल घरी नेला.
याबाबत कासारवाडीचे उपसरपंच नेताजी चेचरे म्हणाले की, ग्रामपंचायतीचे शिष्टमंडळ घेऊन ज्या शेतकर्यांनी वाटा बंद केल्या आहेत, त्या वाटा पुन्हा सुरु करण्यासाठी हातकणंगले तहसीलदार यांच्याबराेबर चर्चा करून शेतकर्यांना पुन्हा वाटा खुल्या करुन न्याय देणार असल्याचे सांगितले.