शेती शिवाय आत्ता पर्याय नाही : मंत्री शिरोडकर
प्रतिनिधी /मडगाव
नावेली मतदारसंघातील सायपे तळय़ाचे भाग्य आत्ता उजवळणार आहे. या तळय़ाचे सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय जल स्त्रोत खात्याने घेतला आहे. जल स्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी काल या तळय़ाची पहाणी केली तसेच नावेली मतदारसंघातील अन्य जल स्त्रोताची पाहणी केली. यावेळी स्थानिक आमदार उल्हास तुयेकर तसेच जल स्त्राsत खात्याचे अभियंते आणि चार पंचायीतचे सरपंच उपस्थित होते.
सायपे तळय़ाबरोबरच झरीवाडा-दवर्ली येथील नैसर्गिक पाण्याची झर, बागा-दवर्ली येथील झर, लायामती जवळील नैसर्गिक पाण्याच्या झरीचा विकास करणे, तसेच डोंगरी ते आकें-बायशला जाण्यासाठी पदपूल बांधणे, मांडप येथे नाल्यातील गाळ उपसणे, पावसाळय़ात या ठिकाणी पूर येऊन लोकांच्या घरात पाणी शिरते. यंदा या ठिकाणी पूर येऊन लोकांच्या घरात पाणी शिरले होते.
सायप तळय़ाचे पुढील दोन वर्षात सौंदर्यीकरण केले जाणार असून या तळय़ाच्या पाण्याचा वापर करून लोकांनी शेती करावी यासाठी देखील प्रयत्न केले जाणार आहेत. गोरक्षकवाडी-आकें-बायश येथील तळय़ाची देखील काल मंत्री सुभाष शिरोडकर यांनी पहाणी केली. या तळय़ाची सुरवात रावणफोंड येथे होऊन मांडप पासून पुढे हे तळे माजी आमदार मानू यांच्या घरापर्यंत पोचले आहे. या तळय़ात झाडे-झुडपी वाढली असून पावसाळय़ात या ठिकाणी पाणी भरून रहाते आणि पाणी लोकांच्या घरानी शिरते. या तळय़ाचा गाळ उपसण्याचे काम देखील हाती घेतले जाणार आहे.
या सर्व कामांवर येणाऱया खर्चा अंदाज पुढील 15 दिवसात तयार करण्याचा आदेश देखील मंत्री शिरोडकर यांनी अभियंत्यांना दिला आहे. अंदाजीत खर्चाला मंजूरी मिळाल्यानंतर पुढील दिड वर्षात ही कामे पूर्णत्वाकडे जाणार आहे.
पाणी साठविण्याचा आदेश
पावसाळय़ानंतर पाणी साठवून ठेवण्याचा आदेश जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिला आहे. साठवून ठेवलेल्या या पाण्याचा वापर शेती तसेच भाजीपाल्याची लागवड करण्यासाठी केला जाणार आहे. पावसाळय़ानंतरचे पाणी वाया जाऊ देऊ नका असा सल्ला ही यावेळी देण्यात आला. या पाण्याचा वापर शेतकऱयांनी करावा व शेतीवर भर द्यावा असे मंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले.
40 ही मतदारसंघाला भेटी देणार
जलस्त्रोत खात्या तर्फे गोव्यातील नैसर्गिक जलस्त्रोचा विकास करण्यास आपण प्राधान्य देणार असून त्यासाठी गोव्यातील 40 ही मतदारसंघांना भेटी देऊन जलस्त्रोताची पहाणी करणार असल्याची माहिती मंत्री शिरोडकर यांनी प्रसार माध्यमांशील बोलताना दिली.
जलस्त्रोत खात्याने जे बंधारे बांधले आहेत. त्यांची निगा राखली जाईल. अन्यथा या बंधाऱयावर खर्च केलेला पैसा वाया जाण्याची शक्यता देखील मंत्री शिरोडकर यांनी व्यक्त केली. आपण, त्या दृष्टीकोनातून लवकरच परिपत्रक जारी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याच बरोबर जलस्त्रोत खात्याचे अधिकारी आठवडय़ातील एक दिवस कार्यालयातून बाहेर जातील व त्यांनी कोणत्या जलस्त्रोताची पहाणी केली व त्यावर कोणत्या उपाय योजना करणे शक्य आहे. यावर संध्याकाळी आपल्याला अहवाल देतील असे मंत्री शिरोडकर म्हणाले.
गोव्यात शेती शिवाय पर्याय नाहाr
गोव्यातील युवक आज सरकारी तसेच औद्योगिक वसाहतीत नोकऱया मिळाव्यात यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांना नोकऱया मिळायला पाहिजेच, त्याच बरोबर शेतीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. गोव्यात शेती शिवाय दुसरा पर्याय नसल्याचे आपले ठाम मत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
नाल्यात सांडपाणी सोडू नका…
नाल्यात सांडपाणी सोडणे हा गुन्हा आहे. मात्र, मडगाव व फातोर्डा परिसरात सांडपाणी नाल्यात सोडण्याचे प्रकार घडत आहेत. ते त्वरित बंद करावे असे आवाहन यावेळी मंत्री शिरोडकर यांनी केले. सांडपाणी नाल्यात न सोडता त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था करता येईल का या दृष्टीकोनातून प्रयत्न सुरू आहेत. सांडपाणी नाल्यात सोडल्याने शेतकरी शेती करू शकत नाही. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असतो याकडे त्यांनी लक्ष वेधले.