मुलांना गोड खाऊ भरवून पोषण अभियानाला चालना ः समस्या निदर्शनास आणून देण्याचे केले आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी शनिवारी मुडलगी तालुक्मयातील भैरनट्टी येथे ग्रामवास्तव्य केले. ‘जिल्हाधिकाऱयांचे पाऊल खेडय़ाकडे’ या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी नूतन जिल्हाधिकाऱयांनी बेळगाव जिह्यातील आपले पहिले ग्रामवास्तव्य केले.
मुडलगी हा नवा तालुका आहे. या नव्या तालुक्मयातील समस्या जाणून घेण्यासाठी आपले पहिले ग्रामवास्तव्य जिल्हाधिकाऱयांनी मुडलगी तालुक्मयातील भैरनट्टी येथे केले. गावकऱयांनी जिल्हाधिकाऱयांचे गावच्या प्रवेशद्वारावर स्वागत केले. त्यानंतर जडीसिद्धेश्वर मंदिरापर्यंत पायी चालत जाऊन जिल्हाधिकाऱयांनी सरकारी शाळेला भेट दिली.
शाळेच्या आवारात रोपटी लावून विद्यार्थ्यांशी चर्चा केली. महिला व बाल कल्याण खात्याच्यावतीने आयोजित करण्यात आलेले पोषण अभियान व पौष्टिक आहार शिबिराला जिल्हाधिकाऱयांच्या हस्ते चालना देण्यात आली. यावेळी त्यांनी लहान मुलांना गोड खाऊ भरविले.
आरोग्य मेळाव्याची पाहणी
आरोग्य खात्याच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य मेळाव्याचीही त्यांनी पाहणी केली. या मेळाव्यात 120 जणांचे डोळे तपासण्यात आले आहे. तर दहा जणांना चष्म्याचे वितरण करण्यात आले. जडीसिद्धेश्वर मंदिराच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. गावातील रस्ते, गटारी, पाणी समस्यांकडे जिल्हाधिकाऱयांचे लक्ष वेधण्यात आले.
सरकारी जागेत उभारण्यात येत असलेल्या घरांची हक्कपत्र वितरीत करण्याची मागणी काही जणांनी केली. अक्रम-सक्रम योजनेंतर्गत नियमानुसार अर्ज दिल्यास योग्य निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱयांनी दिले. विधवा पेन्शनसंबंधीच्या प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. नागरिकांनी कोणत्याही समस्या आपल्या निदर्शनास आणून द्याव्यात, कायद्याच्या चौकटीत त्या दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी बैलहोंगलचे प्रांताधिकारी शशिधर बगली, मुडलगीचे तहसीलदार डी. जी. महांत यांच्यासह वेगवेगळय़ा खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.