आमदार राजेश फळदेसाई यांचा इशारा ; मासेमारीमुळे शेतजमीन लागवडीविना पडून
वार्ताहर /जुने गोवे
आपल्या मतदार संघात फिश माफीयांची जी गैर कृत्ये चालली आहे ती ताबडतोब थांबविली नाही तर त्यांची मुळीच गय केली जाणार नाही. प्रचलित कायद्यानुसार त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे प्रतिपादन कुंभार जुवें मतदार संघाचे आमदार श्री राजेश फळदेसाई यांनी केले.
करमळी तिसवाडी येथील तळे सावट शेत जमिनी त शेती करणारे शेतकरी त्यांच्या कार्यालयात शेत जमिनी त खारे पाणी भरून ठेवत असल्याची तक्रार आमदारांकडे घेऊन आलेल्या शेतकऱयांशी ते बोलत होते. यावेळी करमळीचे सरपंच कुष्टा सालेलकर,विठू वरगांवकर,सदू खोलकर, लक्ष्मण काणकोणकर, आत्माराम गावणेकर,राजेश काणकोणकर व इतर शेतकरी उपस्थित होते.
मासेमारीमुळे शेतकऱयांवर अन्याय
आमदार पुढे म्हणाले की, संबंधित मामलेदारानी घालून दिलेल्या अटी प्रमाणे मासेमारी करण्यास शेतकऱयांची व आपली सुध्दा मुळीच हरकत नाही. पण घालून दिलेल्या अटींचे उल्लंघन करून गैर मार्गाने चांगल्या सुस्थितीत असलेल्या मानसेची कवाडे रात्रीच्या वेळी विविध क्ल?प्त्या लढवून उघडी ठेवून शेत जमिनीत मुद्दामहून खारे पाणी भरून ठेवण्यासाठी शेतकऱयांचा सक्त विरोध आहे. गेली तीन ते चार वर्षे शेतजमीनीत खारे पाणी भरून ठेवत असल्याने कसलेच पीक घेता आले नाही. आपल्या मतदार संघात मोठय़ा प्रमाणात खाजन शेती असल्याने गैर मार्गाने फिश माफीयांची या जमिनी त खारे पाणी भरून ठेवत असल्याच्या तक्रारीही आपणाकडे येत असल्याने आता कडक पावले उचलल्या शिवाय आपणाकडे पर्याय नसल्याचे आमदारांनी स्पष्ट सांगितले.
मानशीचा काराभार सग्यासोयऱयांकडेच
तळे सावट करमळी येथील मानसेचा कारभार तीन सदस्यीय अस्थायी समिती पाहत असुन समितीच्या अध्यक्षांनी आपल्याच नातेवाईकांना मानसिची पावणी दिली असून त्यामुळेच रात्रीच्या वेळी कवाडे उघडी ठेवून भरतीच्या वेळी शेत जमिनीत गैर मार्गाने खारे पाणी भरून ठेवण्याचे प्रकार घडत आहे. म्हणून तिसवाडी मामलेदारानी ताबडतोब तीन सदस्यीय अस्थायी समिती बरखास्त करावी व फक्त शेतकऱयांचीच कायम स्वरुपी समिती नेमण्यासाठी आमदारांनी प्रयत्न करावे अशी मागणी करमळी चे सरपंच कुष्टा सालेलकर यांनी केले. पाणी भरून ठेवण्याचे प्रकार बंद होऊन यंदा जर शेतजमीन सुकी राहिलीच तर पुढच्या वषी दोन्ही पीके घेऊ शकतो असे शेतकरी सदू खोलकर, लक्ष्मण काणकोणकर, राजेश काणकोणकर व इतर शेतकऱयांनी यावेळी आमदारांना सांगितले.
आता वांयगणी शेतीही करणे दुरापास्त करमळींच्या तळय़ाच्या पाण्याचा वापर करून या शेतजमीनीत मोठय़ा प्रमाणात वायंगण शेती केली जात होती, पण गेल्या काही वर्षांपासून खारे पाणी भरून राहत असल्याने आता वायंगण शेती करणे आता शक्मय होत नाही असे विठू वरगांवकर व आत्माराम गावणेकर या शेतकऱयांनी सांगितले. कुंपणच शेत खातं असे काही शेतकरयांचे म्हणणे आहे. शेतजमिनीत खारे पाणी भरून ठेवण्यास संबंधित काही अधिकाराचाच पाठिंबा मिळत असल्यानेच फिश माफीयांची चांगलेच फावत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. फळय़ा घालून पाणी अडविण्यासाठी चार दरवाजे बांधण्यात आले आहेत, पण त्यांचीही देखभाल व्यवस्थित होत नसल्याचे सरपंच कुष्टा सालेलकर यांनी सांगितले.