पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
युपेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळे जगभरातील पुरवठा साखळय़ा खंडित झालेल्या असल्या आणि जगभरात खतांच्या किमतींमध्ये वाढ झालेली असली तरीही भारतीय शेतकऱयांना खरीप हंगामासाठी खतांचा पुरवठा सुरळीत राखण्यामध्ये केंद्र सरकारला यश आलेले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
युद्धस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने योग्य वेळी पावले उचलल्याने खताचा पुरेसा साठा करण्यात यश आले आहे. त्याचप्रमाणे खतांवरील अनुदानातही खरीप हंगामाच्या आधीच मोठी वाढ केल्यामुळे भारतातील बाजारांमध्ये खतांचे दर वाढलेले नाहीत. याचा लाभ शेतकऱयांना आणि सर्वसामान्य जनतेलाही होणार आहे. शेतकऱयांचे बळ वाढविण्यासाठी शक्मय ते सर्व प्रयत्न केले जातील. आवश्यकता भासल्यास नियमांमध्ये बदल करून खतपुरवठा सुरळीत ठेवण्यात येईल, असे पंतप्रधान मोदी यांनी सहकारी संस्थांच्या चर्चासत्र कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केले. त्यांनी या कार्यक्रमात दिल्लीहून ऑनलाईन सहभाग घेतला.
गुजरातमध्ये दुधाचा सहकारी व्यवसाय एका चळवळीच्या स्वरुपात साकारला गेला. यामुळे राज्यभरात शेतकऱयांना उत्पन्नाचे आणखी एक खात्रीचे साधन प्राप्त झाले. या दूध चळवळीमुळे गुजरातमधील अनेक खेडय़ांचा कायापालट झाला. सहकारी दुग्ध व्यवसाय राज्यात अधिक बळकट करण्यासाठी केंद्र सरकारने बरेच प्रयत्न केलेले असून आज राज्यात अनेक दुग्ध सहकारी संस्था कार्यरत आहेत. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन घेणारे गुजरात हे भारतातील सर्वात मोठे राज्य असल्याचे प्रतिपादनही पंतप्रधान मोदी यांनी केले.
रुग्णालयाचे उद्घाटन
गुजरातमधील अटकोट येथे त्यांच्या हस्ते मातोश्री केडीपी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे शनिवारी उद्घाटन करण्यात आले. 200 खाटांच्या या रुग्णालयाच्या निर्मितीत भाजप नेते भरत बोहरा यांनी पुढाकार घेतला होता. याचे व्यवस्थापन श्री पटेल सेवा समाजाकडून करण्यात येत आहे. गेल्या आठ वर्षात केंद्र सरकारच्या धोरणांमुळे गुजरातमध्ये आणि देशभरातही आरोग्य व्यवस्थेत मोठी सुधारणा झाली आहे. शंभराहून अधिक नवी सुपर स्पेशालिटी रुग्णालये बांधण्यात आली असून आणखी 300 रुग्णालयांची निर्मिती सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. सरकारने गरीबांसाठी विनामूल्य धान्य योजना सुरूच ठेवली असून विनामूल्य लसीकरणाचा कार्यक्रमही सुरू आहे. 10 कोटी घरांना शौचालये देण्यात आली आहेत. 9 कोटी महिलांना गॅस सिलिंडर्स देण्यात आलेली आहेत आणि 2.5 कोटी घरांना वीजपुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.