भाजपचे राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी
नार्वेकर यांना 164 तर शिवसेनेचे राजन साळवी यांना 107 मते
प्रतिनिधी/ मुंबई
सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतफत्वाखालील सरकार पहिली परीक्षा आरामात उत्तीर्ण झाले आहे. भाजपचे कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी बहुमताने निवड झाली. राहुल नार्वेकर यांना 164 मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांना 107 मते मिळाली. देशभरात राहुल नार्वेकर हे सर्वात तरुण अध्यक्ष ठरले आहेत.
नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर गेले दीड वर्ष विधानसभेचे अध्यक्षपद रिक्त होते. मात्र एकनाथ शिंदे यांच्या नेतफत्वाखाली शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन होताच अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर करण्यात आली. कार्याध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी नार्वेकर यांची अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी घोषणा करताच दोन्ही बाजूचे आमदार उठून उभे राहिल्याने नार्वेकर यांच्या बाजूचे आणि विरोधी कोण याचा थांगपत्ता लागत नव्हता. त्यामुळे उपाध्यक्ष झिरवळ यांनी मतदान जाहीर केले.
एकूण 271 आमदारांनी अध्यक्षपदासाठी केले मतदान
आवाजी मतदानात एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार, अपक्ष आमदार आणि अन्य छोटय़ा पक्षांचे आमदार यांच्या पाठिंब्याने राहुल नार्वेकर यांनी बहुमताचा आकडा पार करत 164 मते मिळविली. तर महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना 107 मते मिळाली. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी, रईस शेख आणि एमआयएमचे आमदार शाह फारूख अन्वर हे तटस्थ राहिले. भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक हे प्रकृतीच्या कारणास्तव मतदानाला उपस्थित राहू शकले नाहीत. अध्यक्षपदासाठी एकूण 271 आमदारांनी मतदान केले.
अध्यक्षपदासाठी राजन साळवी यांना मतदान करावे, यासाठी शिवसेनेने आदेश काढला होता. मात्र एकनाथ शिंदे गटाने राहुल नार्वेकर यांना पाठिंबा दिला. यावेळी शिवसेनेचे गटनेते आमदार अजय चौधरी यांनी दिलेल्या पत्राचे वाचन करताना उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेच्या आमदारांनी पक्षाने दिलेल्या आदेशाच्या विरोधात जाऊन नार्वेकर यांना पाठिंबा दिल्याचे नमूद केले. शिवसेनेच्या एकूण 55 आमदारांपैकी 16 आमदारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना तर 39 आमदारांनी नार्वेकर यांना पाठिंबा दिला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर शिंदे यांच्या गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनीही 16 आमदारांनी पक्षादेश झुगारल्याचे पत्र अध्यक्ष नार्वेकर यांना दिले. प्रहार संघटनेचे आमदार आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू, बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर आदी छोटय़ा पक्षाच्या आमदारांनी राहुल नार्वेकर यांना मतदान केले.
महाविकास आघाडीच्या मतदानात घट
राष्ट्रवादी काँगेसच्या एकूण 54 आमदारांपैकी अनिल देशमुख आणि नवाब मलिक कारागहात असल्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवळ उपाध्यक्षपदी असल्याने त्यांना मतदान करता आले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस 4, काँग्रेसचे 2 आमदार अनुपस्थित होते. त्यामुळे महाविकास आघाडीचे मतदान घटले.
सन्मानाने आसनाकडे
राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड घोषित झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, राष्ट्रवादीचे अजित पवार, जयंत पाटील, शिवसेनेचे अजय चौधरी यांनी त्यांना सन्मानाने आसनापर्यंत नेले. तसेच त्यांचे अभिनंदन केले.
अभिनंदनाचा वर्षाव
देशाच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड होताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. देशाच्या इतिहासातील ते सर्वात तरुण अध्यक्ष आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. या सभागहाच्या अध्यक्षस्थानाला एक विशेष महत्त्व आहे. या ठिकाणी वेगवेगळे कायदे आपण करतो. या सभागहाचे अध्यक्ष होणे, हा देखील एक अत्यंत भाग्याचा असा योग आहे. सभागफहाच्या अध्यक्षांची भूमिका एका न्यायमूर्तीसारखी आहे आणि सगळय़ांना न्याय देण्याचा प्रयत्न या आसनावरून करावा लागतो. या कायदेमंडळाला एक अतिशय कायद्यात निष्णात असलेले असे अध्यक्ष मिळाले आहेत. या पूर्वीच्या सगळय़ा अध्यक्षांनीही अतिशय उत्तम काम या आसनावरून केले आहे, असे ते म्हणाले.
सासरे-जावई उच्चस्थानी
विधान परिषद सभागहातील सभापती आणि विधानसभागफहाचे अध्यक्ष यांचे नाते हे सासरे आणि जावयचे आहे. नार्वेकर यांचे रामराजे यांच्यावर प्रेम आहे. दोघेही सर्वांना न्याय देण्याच्या भूमिकेने काम करतील. त्यामुळे राज्य विधिमंडळाची प्रतिष्ठा नक्कीच वाढेल, असे फडणवीस म्हणाले.
पहिल्याच टर्ममध्ये विधानसभा अध्यक्ष
राहुल नार्वेकर यांनी 2019 ला पहिल्यांदा भाजपतर्फे कुलाबा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि अडीच वर्षात सत्तांतर झाल्यानंतर त्यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. पहिल्याच टर्ममध्ये त्यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली.
ठाण्याला मुख्यमंत्रिपद तर मुंबईला विधानसभा अध्यक्षपद
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ठाण्याला पहिल्यांदा मुख्यमंत्रिपद मिळाले तर मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. यापूर्वी राज्यात युतीचे सरकार असताना 1995 साली शिवसेनेचे दत्ताजी नलावडे हे विधानसभा अध्यक्ष होते, त्यानंतर आता मुंबईला विधानसभा अध्यक्षांचा मान मिळाला.
एक लढाई जिंकली, विश्वासदर्शक ठरावाचे काय?
बंडखोर शिवसेना गट आणि भाजप यांच्या साहाय्याने विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक भाजपचे आमदार नार्वेकर यांनी जिंकली असली तरी सोमवारी होणाऱया विश्वासदर्शक ठरावाचे काय, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. बहुमताच्या जोरावर सरकार विश्वासदर्शक ठराव जिंकेलही, पण तो न्यायालयात टिकेल का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे व भाजप गटाला 164 मते मिळाली आहेत. त्यामध्ये 39 मते बंडखोर शिवसेना गटाची आहेत. सेमवारी विश्वासदर्शक ठरावावेळीही शिंदे सरकारच्या बाजूने मतदान होईल. आमदारांच्या गणतीवर शिंदे यांच्या नेतफत्वाखालील सरकार विश्वासदर्शक ठरावही जिंकेल. पण न्यायालयीन लढाईत काय होईल, हे कोणीही सांगू शकत नाही. व्हीपचा अव्हेर केला म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नेतफत्वाखालील शिवसेनेने बंडखोर 39 आमदारांविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तर 16 आमदारांना अपात्र ठरवावे म्हणून सर्वोच्च न्यायालयात याचिका, त्या अपात्र आमदारांना विधानसभा अध्यक्ष निवडीच्या मतदानात भाग घेता येऊ नये म्हणून दुसरी याचिका आणि आता व्हीपचा अवमान केला म्हणून याचिका, अशा प्रकारे शिवसेनेकडून तीन याचिका दाखल झाल्या आहेत. त्याबाबत न्यायालयाला निर्णय द्यावाच लागेल. अध्यक्षपदाच्या निवडीबाबत शिंदे गटाकडून 16 जणांविरुद्ध व्हीप झुगारल्याचा अर्ज आहे तर उद्धव ठाकरे यांच्या गटाने 39 जणांनी व्हीप झुगारल्याचे पत्र आहे.
आज अध्यक्षांच्या बाजूने झालेल्या 164 मतदानातून शिंदे गटाची 39 मते वगळली तरी भाजपकडे 125 राहतात तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे 107 मते राहतात. जरी 39 जण तटस्थ राहिले तरीही विवासदर्शक ठराव मंजूर होईल.